HW News Marathi
Covid-19

मुंबईप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमण्यात येणार – अमित देशमुख

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईत वाढतानाच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमण्यात येणार असल्याची घोषणा अमित देशमुख यांनी केली आहे.

कोरोना विरुद्ध सुरू असलेला लढा आणखी प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमण्यात येणार आहेत. या टास्कफोर्समध्ये डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ यांचा समावेश असणार आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपचार, उपाययोजना त्याचप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणे व त्यांचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर हा टास्कफोर्स काम करणार असल्याची माहिती अमित देशमुख यांनी दिली.

जिल्ह्याधिकाऱ्यांना अशा प्रकारचे टास्क फोर्स नेमण्याबाबत कळवण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिले आहेत.राज्यात सध्या साथरोग अधिनियम १८९७ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात येत असलेल्या या नव्या टास्क फोर्सच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करता येईल असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भय इथले संपत नाही! रुग्णवाढीचा स्फोट कायम, देशात गेल्या २४ तासांत ३ लाखांच्यावर रुग्ण

News Desk

मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण

News Desk

कोरोना परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा; कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करा! – अजित पवार

Aprna