HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसे आणि नारायण राणे यांची केंद्रात वर्णी

नवी दिल्ली | नारायण राणे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष्याची स्थापना केली. त्यानंतर ते एनडीएत सामील झाले. राणे हे गेल्या अनेक दिवसापासून राज्याच्या राजकारणात सक्रीय होण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत. यासाठी राणेंनी दिल्लीत जावून भाजपचे अध्यक्ष आमित शहा यांची भेट देखील घेतली. या भेटीनंतर राणेंना केंद्रात पाठविण्यात येणार असल्याचे चर्चाला उधान आले आहे.

तसेच गैरव्यवहाराच्या आरोपामुळे एकनाथ खडसे यांना महसूलमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर खडसे सुद्धा राजकारणापासून काही काळ लांब राहिले होते. पण, पक्ष्याकडून त्यांना केंद्रात पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

येत्या २३ मार्चला राज्यसभेच्या ५८ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात राज्यसभेसाठी ६ जागावर निवडणुका होणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातून भाजपचे ३ उमेदवार राज्यसभेत पाठवण्यात येणार आहे. भाजपच्या वतीने दोन जांगेवर नारायण राणे आणि एकनाथ खडसे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाला असल्याचे कळत आहे. आता एका जाग्यांवर भाजपमधील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंघोळीची गोळी संस्थेला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

News Desk

सर्वोच्च न्यायालयाचा जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा आदेश

Gauri Tilekar

खडसेंचे जावई गिरीश चौधरी १९ जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत

News Desk