HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाही !

नवी मुंबई | नवी मुंबईत भाजपचे राज्यव्यापी अधिवेशन कालपासून (१५ फेब्रुवारी) सुरू झाले असून या अधिवेशनाला चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांसह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. महाविकास आघाडीच्या सरकारला संबोधित तीन पक्षाचे आघाडी सरकार कोसळून राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणुका होतील, असं भाकीत भाजप नेते वर्तवत असले तरी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मात्र राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नसल्याचा दावा केला आहे. राज्यातील तीन पक्षाच्या या सरकारमध्ये अनेक मुद्द्यांवरुन आपापसांतच मतभेद आहेत आणि आता हे मतभेद उघड होऊ लागल्याने त्यांच्यातील तिढा वाढून सरकार मोडेल पण राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे आम्ही निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत, असे वक्तव्य केले होते. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही, आम्हाला त्यात रस नाही. ते आपापसातील मतभेदांमुळेच पडेल. भाजप आता मध्यावधी निवडणुकांसाठी तयारी सुरु करणार आहे, असेही पाटील म्हणाले होते. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर आता एकनाथ खडसेंनी केलेले हे वक्तव्य आश्चर्यकारक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

News Desk

BSNLच्या 4G अपग्रेडेशनसाठी काढलेल्या निविदा दूरसंचार मंत्रालयाने केल्या रद्द

News Desk

धारावीत एकाच कुटुंबातील २ जण कोरोना पॉझिटिव्ह, धारावीचा आकडा ७ वर

News Desk