HW News Marathi
महाराष्ट्र

#MaharashtraElections2019 : राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६०.०५ टक्के मतदान

मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी आज (२१ ऑक्टोबर) मतदान पार पडले. राज्यभरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६०.०५ टक्के मतदान झाले आहे. तर साताऱ्यातील पोटनिवडणुकीत ६०. २५ टक्के मतदान झाले आहे. तसेच कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त म्हणजे सरासरी ६९ टक्के मतदान झाले असून तर ठाण्यात ४३ टक्के सर्वात कमी मतदान झाले. राज्यभरात आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. राज्यात एकूण ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत.

तसेच पुरुष ४ कोटी ६८ लाख ७५हजार, ७५० आणि महिला ४ कोटी २८ लाख ४३ हजार ६३५ मतदार आहेत. तसेच राज्य पोलीस दलातील सुमारे ४० हजार कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तावर असतील. मतदान केंद्राचा परिसर आणि स्ट्राँगरूमच्या बाहेर चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अचानक उद्भवलेला प्रसंग निस्तारण्यासाठी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तयार ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्राच्या परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे, तसेच केंद्राच्या आतमध्ये मोबाइल नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…

News Desk

जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी दर महिन्याला होणार लोकांसमवेत बैठक

News Desk

हायपरलूपच्या स्वप्नाला ‘रेड सिग्नल’

swarit