HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील विधानपरिषदेच्या ६ जागांवर निवडणूक आयोगाचे वेळापत्रक जाहीर

मुंबई। राज्यातील ५ मतदारसंघातील विधानपरिषदेच्या ६ जागांवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून एकूण ८ विधानपरिषद आमदारांचा कार्यकाळ संपत आला आहे. यामध्ये शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रामदास कदम, काँग्रेस नेते भाई जगताप यांचाही समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १० डिसेंबर रोजी निवडणूक घेण्यात येईल तर निवडणुकीचा निकाल ४ दिवसानंतर १४ डिसेंबर २०२१ रोजी लागेल. कोरोना काळानंतर राज्यातील विधानपरिषदेची ही पहिलीच निवडणूक असेल.

राज्यातील विधानपरिषदेच्या एकूण ६ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील दोन जागा आहेत. तर कोल्हापूर, धुळे, अकोला आणि नागपूर या मतदारसंघात निवडणूक होणार आहे. विधानपरिषद सदस्यांची मुदत संपत आली असल्यामुळे या निवडणुका घेण्यात येत आहे. ६ जागांवरील सर्व सदस्यांची विधानपरिषदेवरील मुदत ही १ जानेवारी २०२२ रोजी संपणार आहे.विधानपरिषदेची मुदत डिसेंबरमध्ये संपणाऱ्या नेत्यांमध्ये मुंबईतून शिवसेना नेते रामदास कदम, काँग्रेसचे भाई जगताप, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, भाजपचे अमरिश पटेल, शिवसेनेचे गोपी किशन बाजोरिया, गिरीश व्यास, भाजपचे प्रशांत परिचारक, अरुण जगताप या नेत्यांचा समावेश आहे.

असं आहे निवडणुकीचे वेळापत्रक

राज्य निवडणूक आयोगाकडून १६ नोव्हेंबर २०२१ रोजी नोटीफिकेशन काढण्यात येईल. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत असेल.उमेदवारी अर्ज पडताळणी २४ नोव्हेंबरपर्यंत करण्यात येईल.उमेदवाराला अर्ज मागे घ्यायचा असल्यास २६ नोव्हेंबरपर्यंत घेऊ शकतो.विधानपरिषदेसाठी १० डिसेंबरला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळात मतदान घेण्यात येईल.

मत मोजणी १४ डिसेंबरला करण्यात येऊन निकाल जाहीर करण्यात येईल.

महाविकास आघाडीसाठी निवडणूक महत्त्वाची

आता शिवसेनेचे रामदास कदम यांची जागा टिकवणं शिवसेनेसाठी महत्वाचं मानलं जातं आहे. रामदास कदम यांना शिवसेना संधी देणार का हे पाहावं लागणार आहे. रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मान्य असेल,असं म्हटलं आहे. तर, तिकडे दुसरीकडे मुंबईतील काँग्रेसची भाई जगताप यांची जागा देखील काँग्रेससाठी महत्त्वाची ठरणार आहे. भाई जगताप हे सध्या मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्यानं त्यांना काँग्रेस पुन्हा संधी देणार का हे पाहावं लागणार आहे. तर, धुळे नंदुरबारमध्ये भाजपचे अमरिश पटेल यांचं एकहाती वर्चस्व असल्यानं भाजप त्यांना पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे.


 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपशासित राज्यांमध्ये डझन पत्रकारांवर अटक झाली तेव्हा भाजप कुठे होतं?- प्रशांत भूषण

News Desk

राम शिंदेंच्या मुलीचा विवाह सोहळा, रोहित पवार-फडणवीस आमनेसामने

News Desk

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा, NDRF पथकांना सज्ज ठेवा! – मुख्यमंत्री

Aprna