HW News Marathi
महाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या निवडणुका! ओबीसी विरुद्ध ओबीसी असा लढा रंगणार

नागपूर | ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अजूनही सुटलेला नाही आणि त्यातच आता आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबद्दल महत्वाचा निर्णय समोर आला आहे. ओबीसी समाज आपल्या हक्कांबाबत प्रचंड जागृत झाला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना याच मार्गाने जावं लागेल. नाही तर त्यांना महागात पडेल, असा इशारा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी

विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकांबद्दल माध्यमांशी संवाद साधला आहे. ओबीसींच्या हक्काचं आरक्षण वगळून कुणालाही पुढे जायचं नाही. राज्यातील ओबीसी जागृत आहे. ओबीसींच्या जागेवर इतरांना उभं करणं सर्वच पक्षाला महागात पडणार आहे. त्यामुळे उद्या ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची वेळ आली तर सर्वच पक्ष ओबीसींच्या आधीच्या आरक्षित जागेवर उमेदवार देणार आहेत. तसं सर्वच पक्षाने जाहीरही केलं आहे. आमच्या पक्षाचीही तीच भूमिका आहे. पुढील जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी अशीच निवडणूक होईल. ओबीसी विरुद्ध खुला वर्ग अशी निवडणूक होणार नाही. सगळ्यांना त्या प्रक्रियेतून जावं लागेल, ते करावंच लागेल. त्यातच त्यांचं भलं आहे. कारण राज्यातील ओबीसी जागृत आहे, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री गरज पडल्यास आणखी बैठक घेतील

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होण्याची जी चर्चा होत आहे. ती केवळ पाच जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे. पाच जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ज्या 87 जागा रिक्त झाल्या होत्या त्यावर निवडणूक आयोगाने पत्रं पाठवून सद्यस्थितीची माहिती मागवली आहे. मागच्यावेळीही अशी माहिती मागवली होती. त्यावेळी कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. तेव्हा आयोग आणि कोर्टाला आम्ही तशी विनंती केली होती. आज जरी निवडणूक आयोगाने पत्रं पाठवलं असलं तरी निवडणूक प्रक्रियेला दोन महिन्यांचा कालवधी लागतो. सप्टेंबर अखेर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची अपेक्षा आहे. ऑक्टोबरमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. ही परिस्थिती पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी वस्तुनिष्ठ माहिती देतील. पण ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये हे सर्वांचं मत आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन बैठका घेतल्या आहेत. मुख्यमंत्री गरज पडल्यास आणखी बैठक घेतील. त्यात सर्वंकष चर्चा करून निर्णय घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचं निमंत्रण नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीचं आयोजन केल्याबद्दल मला माहीत नाही. मला निमंत्रण आलेलं नाही. गणेशोत्सवामुळे मी विदर्भात असल्याने माहिती मिळाली नाही. तसेच आज महाज्योतीची बैठक असल्यामुळेही मला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाता येणार नाही. मात्र, उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून मी त्यावर चर्चा करेल, असं त्यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मदर्स युनायटेड मूमेंट : धीरोदात्त मातांच्या वाटचालीचा गौरव करणाऱ्या जागतिक चळवळीला पंतप्रधानांचा पाठिंबा

News Desk

“माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती” परळीत स्वागतानंतर जयंत पाटलांची बोलकी प्रतिक्रिया!

News Desk

माझगावमधील जीएसटी भवनमध्ये अग्नितांडव, अग्निशमनदल घटनास्थळी दाखल

swarit