HW News Marathi
महाराष्ट्र

कृषी पंपांचे थकीत वीजबील भरा नाही तर वीज खंडीत करणार

वीज बील भरण्यासाठी १५ नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ

मुंबई – कृषी पंपाचे थकीत वीज बील १५ नोव्हेंबर पर्यंत भरण्याची मुभा सरकारने दिली आहे. जर थकित वीज बील या कालावधी शेतकऱ्यांनी भरले नाही तर त्यांची वीज खंडीत केली जाईल. दरम्यान सरकारने कृषी पंपाचे थकित वीज बील भरण्यास मुदतवाढ दिली आहे. या आधी ७ नोव्हेंबरपर्यंत थकीत वीज बील भरायची होती. त्याला आता मुदतवाढ देण्यात आली असून त्यांना १५ नोव्हेंबर पर्यंत थकीत वीज बील भरता येणार आहे. शिवाय १५ नोव्हेंबर पर्यंत चालू वीज बील ही शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबर पर्यंत कोणत्याही कृषी पंपाची वीज खंडीत केली जाणार नाही. त्यामुळे काही वेळासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र १५ नोव्हेंबर पर्यंत वीज बील भरले नाही कृषी पंपाची वीज खंडीत केली जाईल. दरम्यान मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला तर त्यांच्या बीलावर आकारण्यात आलेल्या दंडाचे व्याज माफ केले जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आमदार निलेश लंकेंनी अरेरावी, शिवीगाळ, मारहाण केली नाही’

News Desk

“… तर फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा”, भाजप नेत्याच वक्तव्य!

News Desk

पब,डिस्को,बार यांना सवलतींचा प्रसाद मात्र गणेशोत्सव बंदिवासात!

News Desk