HW News Marathi
महाराष्ट्र

“आम्ही शरजील सोबत आहोत”, एल्गार परिषद शरजीलच्या पाठीशी ठामपणे उभी

पुणे | पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमधील शरजील उस्मानीच्या भाषणावर विधानावरून वाद पेटला आहे. शर्जीलविरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहे. पण, शर्जीलच्या विधानाचा भाजप आणि संघाने विपर्यास केला आहे, असं म्हणत एल्गार परिषदेने शरजीलच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसंच शरजीलचं संपूर्ण भाषणही प्रसिद्ध केले आहे.

एल्गार परिषदेनं एक पत्रक प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरजीलच्या वक्तव्याचा संघ आणि भाजपनं विपर्यास केला आहे. त्याच्यावर लावण्यात आलेले देशद्रोहाचे आरोप चुकीचे आहे. एल्गार परिषदेचे आयोजक म्हणून आम्ही ठामपणे पाठीशी उभे आहोत असं स्पष्टीकर एल्गार परिषदेनं दिले आहे.

दरम्यान, एल्गार परिषदेचे एक आयोजक माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी यापूर्वीच शरजीलच्या वक्तव्याबाबत माफी मागितली होती. “शरजील चांगलं बोलला पण त्याने ‘मनुवादी’ ऐवजी ‘हिंदू’ शब्द वापरला ही त्याची चूक झाली,” असं कोळसे पाटील यांनी म्हटलं होतं.

यासंदर्भात ‘भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान’ या आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर न्या. कोळसे पाटील यांनी एक निवेदन दिलं. यामध्ये त्यांनी म्हटलं, “३० जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी यानं दिलेलं भाषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा आणि त्यांच्या संघ परिवाराकडून चुकीच्या पद्धतीनं दाखवलं जात आहे. शरजीलला लक्ष्य करुन संघ परिवाराने पुन्हा एकदा आपला धार्मिक विद्वेषाचा आणि जातीयवादी चेहरा दाखवून दिला आहे”

शरजीलवर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आम्ही एल्गार परिषदेचे आयोजक शरजील उस्मानीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असं कोळसे पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. शरजीलवर कारवाईच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

शरजील उस्मानी हा उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्याथी आणिण स्वातंत्र्य शोध-अभ्यासक आहे. शरजील उस्मानी ‘फ्रॅटर्निटी मुव्हमेंट’चा राष्ट्रीय सचिव आहे. एनआरसी, सीएए, एनपीआर विरोधातील आंदोलनात शरजील उस्मानीचा सक्रीय सहभागी होता. उत्तरपदेशचा योगी सरकारने ज्या अनेक तरुणांवर हिंसाचाराचे खोटे आरोप लावून त्यांना अटक केली. त्यात शरजील उस्मानी देखील होता, असा खुलासाही एल्गार परिषदेनं केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशा वातावरणात ‘ते’ माझ्या मनाला पटत नाही, वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र

News Desk

दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात २-३ दिवसांत निर्णय घेणार!

News Desk

उद्धव ठाकरे हेच ५ वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा करणार ? सुप्रिया सुळे म्हणतात…

News Desk