HW News Marathi
महाराष्ट्र

एल्गार परिषदेसंदर्भात पुणे पोलिसांना ६ फेब्रुवारीपर्यंत बाजू मांडण्याची मुदत

पुणे | एल्गार परिषद आणि माओवादी संबंध प्रकरणाची सुनावणी लवकरच होणार असून ती कुठे होणार यावर पुण्याच्या विशेष न्यायालयात चर्चा सुरु आहे. ही परिषद पुण्यात होणार की मुंबईत यावर येत्या ६ फेब्रुवारीला निर्णय होणार असून या विषयावरील सुनावणीसाठी पुणे विशेष न्यायालयाने सरकारी वकिलांना त्यांची बाजू मांडण्यासाठी ६ फेब्रुवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. एल्गार परिषदेच्या तपास प्रकरणाची सर्व कागदपत्रे, पुरावा मुंबईच्या एनआयएच्या विशेष न्यायालयात सादर करावीत यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपास अधिकाऱ्यांनी पुण्यातील विशेष न्यायालयात अर्ज केला होता.

दरम्यान, केंद्र सरकारने २४ जानेवारीला एल्गार परिषदेचा गुन्हा एनआयएकडे हस्तांतरित केला़ होता आणि या हस्तांतरणाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य शासनाला न कळवता गुन्हा हस्तांतरण केला म्हणून निषेध केला होता. त्यानंतर २७ जानेवारीला एनआयएच्या पथकाने पुणे पोलिसांकडे येऊन गुन्ह्याशी संबंधित असलेली कागदपत्रे ताब्यात द्यावीत, म्हणून पत्रही दिले होते़. मात्र, राज्य शासनाकडून अथवा पोलीस महासंचालकांकडून कोणताही आदेश आला नसल्याने पुणे पोलिसांनी कागदपत्रे देण्यास नकार दिला होता़. त्यानंतर एनआयएने न्यायालयात अर्ज दाखल केला होता त्यानुसार न्यायालयाने पुणे पोलिसांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. अजून राज्य शासनाकडून त्याबाबतीतील माहिती पुणे पोलिसांनी न दिल्याकारणाने पुणे पोलीस तपास वर्ग तयार करायला सहमती देणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणेंना केंद्रात मंत्रीपद मिळत असेल तर… ! शिवसेना नेत्याने दिल्या शुभेच्छा

News Desk

‘गृहखात्यावरून’ राजकारण; ‘त्या’ चर्चांना मुख्यमंत्र्यांनी दिला पूर्णविराम

Manasi Devkar

मुख्यमंत्र्यांनी महाडमधील बचाव कार्याचा आढावा घेतला!

News Desk