HW News Marathi
महाराष्ट्र

“कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, मात्र बेशिस्तपणा खपवून घेणार नाही!”- अनिल परब

मुंबई | कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, मात्र बेशिस्तपणा खपवून घेणार नाही, असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी उद्या कामावर परत या, असे पुन्हा एकदा आवाहन परबांनी केले आहे. येत्या एक ते दोन दिवसात एसटी बस सेवा सुरू होईल, असे आश्वासन परबांनी राज्यातील जनतेला आज (२६ नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने त्यांना घसघशीत पगार वाढ दिली आहे. मग आता एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्या. तसेच कामगारांवर अन्याय होणार नाही, यांची देखील काळजी घेतली जाईल, असेही परब म्हणाले. परबांसोबत स्टेट ट्रान्सपोर्ट संघटना, इंटक, कामगार सेना आणि कास्ट ट्राईभ संघटनेचे पदाधिका-यासोबत बैठक झाली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

एसटीची सेवा बंद ठेवणे महामंडळाला आणि कर्मचाऱ्यांना परवडणारे नाही. कोणाचेही नुकसान होऊ नये. यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे आवाहन परबांनी केले आहे. दरम्यान, संप संपल्यानंतर जेव्हा काम सरू होईल. तेव्हा छोट्या-मोठ्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येईल. यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेची दारे खुली असून आम्ही चार पावले पुढे आलो आहोत. तसेच कर्मचाऱ्यांनी एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. कर्मचाऱ्यांचे हक्क अबाधित ठेवणे हेच आमचे काम आहे, असे परब म्हटले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांसह ज्यांच्यावर आरोप झाले त्यांची नार्को टेस्ट करावी, आशिष शेलारांची मागणी

News Desk

सोलापूरमधील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

News Desk

अर्णब गोस्वामींसाठी राज्यपालांची गृहमंत्र्यांना सूचना, कुटुंबीयांना भेटू देण्याचे दिले निर्देश

News Desk