HW News Marathi
क्राइम महाराष्ट्र मुंबई राजकारण

“बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची दक्षता घ्या.” – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई – मालाड मालवणी परिसरात अवैधरीत्या राहणाऱ्या बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांची माहिती मिळवण्यासाठी १९ ऑक्टोबर २०२२ रोजी समिती गठित करण्यात आली होती. त्या समितीची आढावा बैठक घेताना बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांची मालाड मालवणी परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे तेथे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस विभागाने तात्काळ पावले उचलावीत असे निर्देश मुंबई उपनगर चे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

मालवणी परिसरातील सरकारी जमिनीवर केलेला अवैध बळकावा, त्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक समस्या तसेच त्यातुन कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली अवस्था, यासर्व बाबींवर नियंत्रण मिळवण्यासाठी अवैध घुसखोरांविरोधात तात्काळ कारवाईचे आदेश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत.

यावेळी उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, महापालिकेचे उपायुक्त शंकर वार, किरण दिघावकर, झोन ११ चे पोलोस उपयुक्त विशाल ठाकूर आणि शिधा वाटप अधिकारी राहुल साळुंखे उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील घराबाहेर पडतील!

News Desk

पालघरमध्ये पैशांचा बाजार

News Desk

पर्रीकरांचे जळूप्रमाणे खुर्चीला चिकटून राहणे ही कोणती नैतिकता !

News Desk