HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना

मुंबई । राज्यात आता तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून तृतीयपंथीय नागरिकांच्या कल्याणासह त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात येईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. यासंबंधी बडोले यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी (२१ फेब्रुवारी) मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीनंतर त्यांनी याबाबतची माहिती दिली.

“तृतीयपंथीय, ट्रान्सजेंडर हा समाजातील दुर्लक्षित घटक असून त्यांच्याप्रति असलेल्या गैरसमजातून त्यांना समाजाकडून भेदभावाची वागणूक दिली जाते. हा घटक कायम विकासाच्या प्रक्रियेपासून दुर्लक्षित राहिलेला आहे. म्हणूनच शासनाने तृतीयपंथीय घटकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करणाऱ्या तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. याद्वारे येत्या काळात तृतीयपंथीय नागरिकांना सन्मानाने जगण्याचा आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे”, असा विश्वास बडोले यांनी व्यक्त केला.

तृतीयपंथीय कल्याण मंडळाच्यावतीने तृतीयपंथीय नागरिकांना ओळखपत्र वितरीत केली जातील. त्यांना शिक्षणात सहाय्य होईल, अशी मॅट्रीकोत्तर शिष्यवृती देण्यात येईल, पात्र असूनही ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येईल. या योजनेंतर्गत वार्षिक ४८ हजार ते ६० हजार रूपयांपर्यंत त्यांना शिष्यवृत्ती मिळेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हताश, थकलेल्या लोकांची देशाला गरज नाही !

News Desk

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे दूरदर्शी, शिस्तप्रिय व निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआडः बाळासाहेब थोरात

News Desk

Koregaon Bhima Violence | पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची वाढ

Gauri Tilekar