HW News Marathi
महाराष्ट्र

“आजही माझं प्रामाणिक मत, माझं मत मी बदलणार नाही”- विक्रम गोखले

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. ‘1947ला भिक मिळाली, खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं’, या कंगनाच्या विधानाला पाठींबा दिल्याबद्दल जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना देखील टिकेचं धनी व्हावं लागलं. आणि यानंतर पत्रकार परिषद घेत विक्रम गोखले यांनी पुन्हा आता या सगळ्या वक्तव्यावर पडदा टाकला आहे. आपली मतं स्पष्ट केली आहेत. यावेळी त्यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे देखील म्हटले आहे.

पण एखाद्या गोष्टीवर वैयक्तिक मत व्यक्त करणे हा माझा अधिकार

तर पत्रकार परिषदेत पुढे विक्रम गोखले म्हणाले, कंगना रनौत या मुलीने गेल्या दोन वर्षात जी काही वक्तव्ये केली ती मला माहित नाहीत, मात्र तिने स्वातंत्र्याविषयी जे वक्तव्य केलं त्याला तिची काही करणे असतील. त्या तिच्या म्हणण्याला मी दुजोरा दिला, त्याला माझीही काही कारणं असू शकतात. ती समजून न घेता ताबडतोब धुरळा उडवायला सुरुवात केली. मी त्या मुलीला ओळखत देखील नाही, तिच्यासोबत काम देखील केलेलं नाही. काही संबंध नाही. पण एखाद्या गोष्टीवर वैयक्तिक मत व्यक्त करणे हा माझा अधिकार आहे, असे विक्रम गोखले म्हणाले.

मला जे प्रश्न विचारले त्यावरच मी उत्तरं दिली

यापुढेही अभिनेते विक्रम गोखले म्हणाले, मी जे बोललो ते दाखवलंच गेलं नाही. आता अश्रू ढाळणारे जे स्वातंत्र्य सैनिक आहे, त्यांना तेव्हाच कळेल की विक्रम गोखले काय म्हणाले होते आणि त्याचा कसा विपर्यास केला गेला. मी कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान केलेला नाही. त्या मूळ भाषणात मी असं म्हणालो की, विना तलवार आणि ढाल आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, मग जे बाकीचे ज्यांनी स्वतःचे प्राण दिले, फाशीवर चढले, ब्रिटिशांना गोळ्या घातल्या, त्यांची अवहेलना झाली याची आपल्याला कोणालाच शरम वाटत नाही? त्यांची दखल घ्यावीशी वाटत नाही. याचा मला राग आला. माझी वैयक्तिक मतं कोणावर लादायची नाहीत. मला जे प्रश्न विचारले त्यावरच मी उत्तरं दिली. यापेक्षा अधिक आता मला काहीही बोलायचे नाही, असे विक्रम गोखले म्हणाले.

कंगनाच्या विधानाचे केले होते समर्थन

बॉलिवू़ड अभिनेत्री कंगनाने देशाच्या स्वातंत्र्यवरून केलेल्या विधानाला देखील विक्रम गोखले यांनी पाठिंबा दर्शवला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विक्रम गोखले म्हणाले होते की, होय, कंगना रणावतच्या विधानाशी मी सहमत आहे, त्यावेळी देशासाठी फासावर जाऊ दिलं गेलं, त्यांना वाचवता आलं असतं पण त्यावेळी राजकारणात वाचवलं गेलं नाही, असं म्हणत अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंनी कार्यक्रमात सांगितली राजाची गोष्ट, म्हणाले ‘देव करतो, ते भल्यासाठीच करतो!’

News Desk

चित्रा वाघ यांच्यावर भाजपचा आणखीनच दृढ विश्वास ! सोपवली नविन जबाबदारी

News Desk

पुणे मनपात समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकासासाठी ९ हजार कोटीचा निधी द्या – चंद्रकांत पाटील

News Desk