HW News Marathi
Covid-19

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचा कृती आराखडा तयार

नवी दिल्ली | भारतीयकृषी अनुसंधान परिषदेकडून चारही कृषी विद्यापीठांच्या परीक्षा संदर्भातील कृती आराखडा मिळाला आहे. या आराखड्यानुसार विद्यार्थ्यांना पुढील वर्षात थेट प्रवेश देण्याचा आणि अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा लॉक डाऊन नंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून प्रथम वर्षातील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रवेश दिला जाणार आहे.
चारही विद्यापीठांचा कृती आराखडा पुढील प्रमाणे असणार आहे.
* दोन वर्ष कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षांच्या अंतर्गत गुणांच्या आधारे द्वितीय वर्षात प्रवेश
* दोन वर्ष कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाऊन उठल्यानंतर घेतली जाणार
* तीन वर्ष कृषी तंत्र निकेतन प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणदान
* तीन वर्ष कृषी तंत्र निकेतन द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या ५० आणि ५० टक्के अंतर्गत गुणांनुसार तृतीय वर्षात प्रवेश
* तीन वर्ष कृषी तंत्रनिकेतन अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा लॉकडाऊन उठल्यानंतर घेणार
* प्रथम, द्वितीय ,तृतीय पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के गुण चालू सत्रातील अंतर्गत गुणांच्या आणि मागील सत्रातील निकालाच्या सरासरीच्या आधारे गुणदान देऊन पुढील सत्रात प्रवेश
* पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वषार्तील आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा लॉकडाऊन उठल्यानंतर घेणार

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

खुशखबर! मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंंट रात्री १ पर्यंत सुरू राहणार

News Desk

उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं ते धक्कादायक ! । जयंत पाटील

News Desk

“मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच…”, बहिण पंकजाला कोरोना भाऊ धनंजय मुंडेची भावनिक पोस्ट

News Desk