HW News Marathi
देश / विदेश

HW Exclusive | आता लातूर ‘कोरोना’मुक्त, समाधान वाटते !

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे आपण सर्वच जण घरी आहोत. तसेच आपल्या देशातले, राज्यातले नेतेसुद्धा घरूनच आपले काम करत आहेत. त्यामुळे एच.डब्ल्यू.मराठी आता राज्यसभरातील नेत्यांशी व्हिडीओ इंटरव्ह्यूद्वारे संवाद साधून त्या नेतेमंडळींच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या, त्यांच्या खात्याशी आणि त्यांच्या जिल्ह्यांशी संबंधित सद्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर, एच.डब्ल्यू मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याशी व्हिडीओ इंटरव्ह्यूद्वारे संवाद साधला. राज्यात एक नुकताच कोरोनामुक्त झालेला लातूर जिल्हा, त्याचप्रमाणे राज्यात कोरोनाशी लढण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांचा आरोग्य खात्याला कसा हातभार लागतोय याविषयी अमित देशमुख एच.डब्ल्यू. मराठीशी बोलताना काय म्हणाले ? जाणून घ्या

‘कोरोनामुक्त’ लातूर

लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी बोलताना लातूर जिल्हा ‘कोरोनामुक्त’ झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना अमित देशमुख असे म्हणाले कि, “लातूरमध्ये कोरोनाचा शिरकाव अजून तरी झालेला नाही. हीच स्थिती कायम राहावी यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्नशील आहोत. ज्या काही उपाययोजना आवश्यक आहेत, त्या सर्व आम्ही करत आहोत.” त्याचप्रमाणे, सरकारने जारी केलेल्या लॉकडाऊनचे तंतोतंत पालन केल्याबद्दल अमित देशमुख यांनी लातूरकरांचे आभार देखील मानले. त्याचप्रमाणे, यापुढेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यात आवश्यक ती सर्व खबरदारी घेणार असल्याचे देखील अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

‘कोरोना’शी लढण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांचा आरोग्य खात्याला हातभार

“राज्यातील अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्या कोविड-१९ केंद्रे, कोविड- १९ हॉस्पिटल्स, कोविड-१९ लॅब्स, कोविड-१९ क्लिनिक्स हे सर्व सुरु करण्यात आले आहे. सध्या राज्यभरामध्ये हजारो रुग्णांच्या तपासण्या सुरु आहेत. रुग्णांना उपचार देत असताना जी काही अति दक्षता घ्यावी लागत आहे ती लक्षात घेऊन सध्या सगळे डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ अगदी तत्परतेने रुग्णांची काळजी घेत आहेत, त्यांना सेवा देत आहेत”, अशीही माहिती अमित देशमुख यांनी एच.डब्ल्यू मराठीशी बोलताना दिली.

त्याचप्रमाणे, महाराष्ट्रात मुंबई-पुणे वगळता अन्य ठिकाणी बऱ्यापैकी परिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबई-पुण्यात मात्र रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळत आहे. पण तरीही जागतिक पातळीवर विचार केला तर जगभरातील मोठ्या शहरांपेंक्षा निश्चितच आपली स्थिती अधिक नियंत्रणात आहे. हे महाराष्ट्र शासनाचे यश आहे, असे मी मानतो”, असे मत एच.डब्ल्यू. मराठीशी बोलताना अमित देशमुख यांनी व्यक्त केले.

संपूर्ण मुलाखत

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदी जेव्हा समुद्र किनारा साफ करतात तेव्हा…

News Desk

अर्णब गोस्वामींना अटक म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला! अमित शाहांचा ठाकरे सरकार निशाणा

News Desk

भारतीय महिलेचा पाकिस्तानात जबरदस्तीने विवाह

News Desk