HW News Marathi
Covid-19

पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण विधानसभेच्या अध्यक्ष पदाची ऑफर स्वीकारणार का?

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसे राज्यातील राजकारणात देखील दिवसेंदिवस घडमोडी घडत आहेत. नुकतेच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचे अध्यक्ष पदी वर्षी लागणार आहे. तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे असलेले प्रदेशाध्यक्ष पद हे विधानसेभेच अध्यक्ष नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदार सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे.

याआधीच पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचे अध्यक्ष ऑफर देण्यात आली होती. विधानसभा अध्यक्ष व्हायचेच असते तर सहा महिन्यापूर्वीही होता आले असते, असेही आमदार चव्हाण यांनी नमूद केले आहे. पण, तेव्हा चव्हांणी त्यांचा स्वीकार न केल्यामुळे आता पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण विधानसभेचे अध्यक्ष पदाची ऑफर स्वीकारणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. मात्र, अद्यापही पक्षातून कोणी काहीही विचारलेले नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. परंतु चव्हाणांनी देखील त्यांची भूमिका अजून जाहीर केलेली नाही. त्यांची भुमिका नेहमी प्रमाणे गुलदस्त्यातच आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागण्यासाठी नाना पटोले हे दिल्लीला गेले आहेत. सध्या दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटी गाठी घेत आहेत. यामुळे प्रदेशाध्यक्ष पदासाठी सध्या काँग्रेसमध्ये लॉबींग केले आहे. तसेच विधानसभा अध्यक्षपदासाठी चव्हाणांचे नाव दिले आहे. पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले, असा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींना दिला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र. पक्षश्रेष्ठींकडून अद्यापही काहीही विचारणा झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी त्यावर काही मत व्यक्त करणार नाही.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोरोना लसीच्या दोन डोसमधलं अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती”, भारतीय वैज्ञानिकांचा गंभीर दावा!

News Desk

जयंत पाटील यांनी सांगलीला पाठवले ५० हजार मास्क..

Arati More

“राजकारण न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला संजय राऊत अन् जयंत पाटलांना ?”

News Desk