HW News Marathi
Covid-19

राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवणार, राजेश टोपेंची महत्वाची माहिती!

मुंबई | राज्यात सध्या कोरोना रुग्ण संख्या काही अंशी आटोक्यात आली आहे. त्यामुळे सध्या १५ मेपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यात आता आणखी वाढ करण्याची मागणी आजच्या (१२ मे) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी केली आहे. ३१ मेपर्यंत हे लॉकडाऊन सदृश निर्बंध वाढवावे अशी मागणी केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली आहे.

लॉकडाऊन केल्याने रूग्ण संख्या कमी झाली आहे. त्यामुळे मंत्र्यांनी ही मागणी केली आहे. तसेच, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तुर्तास काही काळासाठी स्थगित केले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य देण्याचे काम सुरू असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. अर्थात लॉकडाऊनवर अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देतील असेही टोपे म्हणाले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनावर औषध सापडलं, पतंजलीचा दावा

News Desk

आधी लस उपलब्ध करा, नंतर वाड्यावर बसून वाटप करा, सुजय विखेंचा मंत्री तनपुरेंना अप्रत्यक्ष टोला

News Desk

काँग्रेस नेते राजीव सातव ICU मध्ये, प्रकृती स्थिर; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

News Desk