HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस महाराष्ट्रातचं,दिल्लीवारी नाही ! मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान नाही

नवी दिल्ली। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याची चर्चा हवेत विरून गेल्याचं सध्याच चित्र आहे, तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळणार असलेल्या संभाव्य नेत्यांच्या नावांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा समावेश नसल्यामुळे आता तरी फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणात राहणार असून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाची समीकरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात असतील असे या सगळ्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील भेटीनंतर शिवसेना-भाजपच नातं पुन्हा वाढू लागल्याच्या चर्चांना देखील आता उधाण आलंय, राजकीय उलथापालथ होऊन राज्यात युतीचं सरकार पुन्हा आलं तरी शिवसेना मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत फडणवीस यांच्यासारख्या हुशार नेत्याला राज्यात ठेवणं भाजपला परवडणार नाही. त्यामुळं फडणवीस यांना मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, आज होत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात संभाव्य मंत्री म्हणून फडणवीसांचं नाव कुठेही नाही. त्याऐवजी, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे आता एकंदरीतच महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्यावरच राहणार आहे.

फडणवीस सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत २०१४ साली महाराष्ट्रात भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेण्याची संधी मिळाली होती. शिवसेनेला सोबत घेऊन त्यांनी पाच वर्षे कारभार केला. शिवसेनेसारखा आक्रमक पक्ष सोबत असतानाही सरकारवर भाजपची छाप राहील याची खबरदारी फडणवीस यांनी घेतली. भाजपच्या केंद्रातील नेत्यांशीही त्यांचं चांगलंच जमलं होते. मात्र, २०१९ साली शिवसेनेसोबत झालेल्या सत्तावाटपाच्या वादामुळं भाजपला सत्तेपासून दूर व्हावं लागलं. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदही हुकलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष असतानाही राज्यातील सरकार तुलनेनं स्थिर आहे. म्हणून भाजपला पुन्हा सत्तेत येणं मात्र मुश्कील आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रपुरमध्ये राज्यातील पहिले ‘टच फ्री सॅनिटायझेशन केंद्र’

News Desk

पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या; मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा आढावा

Aprna

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले!

News Desk