HW News Marathi
देश / विदेश

प्रीतम मुंडेंना केंद्रीय मंत्रिमंडळात डच्चू,पंकजा म्हणाल्या…

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात झाली आहे. यादरम्यान अनेक नेत्यांनी राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून राजकीय वातावरणात ताणतणाव निर्माण झाला आहे. यातच आता, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला ओबीसी चेहऱ्याचा विसर पडल्याची टीका प्रकाश शेंडगे यांनी केली. गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे तिला मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे भाजपच्या काही ओबीसी चेहऱ्यावर अन्याय झाला असं म्हटलं जात आहे. यावरुनच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट केलं आहे.

काय आहे पंकजा मुंडे यांचं ट्विट?

या पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे यांच्या भगिनी आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक ट्विट करुन हा संभ्रम दूर केला आहे. खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पहिली ती चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याचे काही राजकीय पडसाद उमटणार का, हे आता पाहणे महत्वाचे असणार आहे.

भाजप खरंच ओबीसीसाठी लढतंय का?

भाजपने ओबीसी आरक्षणासाठी ठोस पाऊलं उचलायचा निर्णय घेतला आहे. खरंतर गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला खरा ओबीसी चेहरा दिला होता. परंतु त्यांच्या कन्येला मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रवेश नाकारल्यामुळे राजिक्य भाजप हे खरंच ओबीसीसाठी लढतंय का हा सवाल उपस्थित झाला आहे. अगदी कालपर्यंत प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर होते.

भाजपने मराठा आणि ओबीस चा राजकारणातला चेहरा महाराष्ट्रातला देण्याचा प्रयत्न केलाय. तर महाराष्ट्रातील ओबीसी आणि मराठा आरक्षण च राजकारण सुरू आहे. त्यामुळे नारायण राणे मराठा समाजाचे नेते आणि कपिल पाटील आगरी समाजाचे तसंच वंजारी समाजाचे भागवत कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याची चर्चा आहे. ओबीसी आणि मराठा कार्डचा फायदा भाजपला पुढील राजकारणात व्हावा हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न आहे.

मंत्र्यांकडून राजीनामे येण्यास सुरुवात

मोदी-कॅबिनेट विस्ताराला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज सांयकाळी होणार आहे. नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार असेल. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगारमंत्री संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी यांनी राजीनामा दिला आहे.

नवीन मंत्री मंडळामध्ये कोणाचा समावेश असेल

रिटा बहुगुणा जाेशी, रामेश्वर कथेरिया, राहुल कासवान, सी. पी. जाेशी, प्रवेश वर्मा किंवा मीनाक्षी लेखी, झफर इस्लाम, अश्वनी वैष्णव, पूनम महाजन, हिना गावित, प्रीतम मुंडे आणि डाॅ. भागवत कराड यांना स्थान मिळेल, असे सांगण्यात आले आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद साेनाेवाल यांच्यासह सुशील माेदी, वरुण गांधी, भूपेंद्र यादव, दिलीप घाेष या भाजप नेत्यांना तसेच लल्लन सिंग (जेडीयू), पशुपती पारस (एलजेपी), अनुप्रिया पटेल (अपना दल), चंद्र प्रकाश (एजेएसयू) यांना सामावून घेण्याचा भाजप पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न राहणार आहे. दरम्यान, नारायण राणे, प्रीतम मुंडे, कपिल पाटील दिल्लीत पोहचले आहेत. डाॅ, भागवत कराड दिल्लीमध्ये आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात अल्पसंख्याकांनाही सामावून घेण्यात येऊ शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवरच राज्याची वाटचाल सुरु ! । उपमुख्यमंत्री अजित पवार

News Desk

आंदोलनाच्या धास्तीने भाजप नेते अण्णा हजारेंच्या भेटीला ?

News Desk

जैविक इंधनावर भारताचे पहिले विमान उड्डाण यशस्वी

Gauri Tilekar