HW News Marathi
देश / विदेश

नुकसानीचे खोटे पंचनामे सहन करणार नाही, अन्यथा रस्त्यावर उतरू !

गंगाखेड | “अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांची पार माती झाली, त्यांच्यावर अस्मानी संकट तर ओढवलेच आहे पण प्रशासनाचे सुलतानी संकट ओढावू नये यासाठी नुकसानीचे पंचनामे योग्य झाले पाहिजेत. खोटे पंचनामे सहन केले जाणार नाहीत अन्यथा त्यासाठी रस्त्यावर उतरू”, असा इशारा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिला आहे. “सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी”, अशी मागणीही यावेळी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

अतिवृष्टीची पाहणी करून आल्यानंतर गंगाखेड जि. परभणी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना पंकजा मुंडे बोलत होत्या. “मराठवाडयात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या पिकांची पार माती झाली आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकारने उभे राहिले पाहिजे. सरकारने बोलायचे एक आणि करायचे एक असे वागू नये. नुकसानीचे खरे पंचनामे करावेत, खोटे पंचनामे केल्यास रस्त्यावर उतरून त्याची होळी करू”, असा इशारा पंकजांनी दिला आहे.

“तुम्ही विरोधी पक्षात असताना जेवढी मदत शेतकऱ्यांसाठी मागत होता, तेवढी मदत आता करा”, असेही पंकजा मुंडे यावेळी सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाल्या. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही पंकजा मुंडे यांनी यावेळी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वेळ आली तर स्वतंत्र लढू पण काँग्रेससोबत महाआघाडी नाहीच | मायावती

Gauri Tilekar

मराठमोळे शरद बोबडे देशाचे नवे ४७ वे सरन्यायाधीश

News Desk

कलबुर्गी हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीकडून एकाला अटक

News Desk