HW News Marathi
महाराष्ट्र

“आता शेतकऱ्यांना मिळणार पगार”

सांगली | राज्यातील शेतकरी दुष्काळ नैसर्गिक आपत्ती यांमुळे त्रस्त असतात . शेतमालाला कमी भाव तसेच अनेक समस्यांमुळे शेतकरी नेहमी चिंतेत असतात. त्यामुळे कुटुंबाचा गाडा चालवताना प्रचंड समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो . नोकरी करणाऱ्यांना ज्याप्रमाणे महिनाभर काम केल्यानंतर विशेष रक्कम पगार स्वरूपात मिळते अशी शेतकऱ्याला देखील मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे नोकरधारकांप्रमाणे शेतकऱ्यांना देखील मासिक पगार देण्याची योजना आणणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील विटा येथे आयोजित बळीराजा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते. या योजनेविषयी अधिक माहिती सांगताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, या योजनेमध्ये चार महिने फक्त त्या संबंधित शेतकर्‍याने सरकारकडे हप्ते भरावयाचे आहेत. उरलेले हप्ते सरकार भरणार आहे. यानंतर दरमहा त्या शेतकर्‍याच्या पत्नीच्या बँक खात्यावर सरकारकडून पगार जमा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पत्नींना घर खर्च चालवताना विशेष कष्ट घ्यावे लागणार नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीमुळे मुंबईच्या महत्त्वास कोणतीही बाधा येणार नाही

News Desk

अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणास अॅड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी दर्शविली सकारात्मक भुमिका 

News Desk

शिक्षण क्षेत्रातील भारतातील पहिले NFT लाँच!

Aprna