HW News Marathi
महाराष्ट्र

‘कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हितासाठीच’ – संजय राऊत

मुंबई | विधिमंडळाचं यंदाचं पावसाळी अधिवेशन संपलं आहे. या वेळी अधिवेशनात बरेच प्रश्न मांडण्यात आले होते. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि कृषी कायदे हे महत्वाचे मुद्दे या अधिवेशनात मांडले गेले. अधिवेशन सुरु असताना भाजप नेत्यांनी गदारोळ सुरु करून, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ केल्यामुळे त्यांच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित केलं गेलं. तरी, अधिवेशनात मांडलेल्या कृषी कायद्यामुळे अनेक राजकीय वंदना सुरुवात झाली आहे. या विषयावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक विधान केलं.

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच

सरकारनेजे कृषी कायदे ठरवले आहेत त्यावरून अनेक वाद महाविकासघडी आणि विरोधीपक्षनेत्यांमध्ये सुरु आहेत. याविषयी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं कि, “महाराष्ट्र सरकारनेजे तीन कृषी बिल आणले आहेत ते शेतकऱ्यांच्या हक्कसाठी आणि सुरक्षिततेसाठी आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी वेगळ्या आहेत, या राज्यामध्ये सतत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं गेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा निर्णय घेतला आहे आणि विधानसभेत त्याला मंजुरी मिळाली आहे”.

दिलीप कुमार या क्षेत्रातले बादशाह होते

सिनेक्षेत्रातले ज्येष्ठ कलाकार दिलीप कुमार यांचं आज (७ जुलै) सकाळी ७.३० वाजता मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी आणि नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. संजय राऊतांनी सुद्धा दुःख व्यक्त केलं आहे. यावर बोलताना ते बोले कि, ” दिलीप कुमार हे खरे बॉलीवूड मधले किंग आणि बादशाह होते. नंतर बादशाह खूप झाले. दिलीप कुमार यांच्या जाण्याने एक युग संपलं असा म्हणता येईल. मनोरंजन क्षेत्रामधल्या तीन पिढ्या त्यांना आदर्श ठेऊन मोठ्या झाल्या.”

हे आहेत तीन नवे कृषी कायदे

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020

शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020

अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा २०२०

दिलीप कुमार परदेशातही लोकप्रिय होते

भारतात दिलीप कुमार यांनी आपलं एक वेगळा स्थान निर्माण केलं होतंच परंतु, परदेशातही दिलीप कुमार लोकप्रिय होते. त्याची प्रचिती आम्हाला आली. आम्ही साऊथ ईस्ट देशात गेलो होतो. दिलीप कुमारही सोबत होते. इजिप्तमध्ये आम्ही उतरलो होतो. एका कार्यक्रमानंतर आम्ही बाहेर पडलो. तेव्हा दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी इजिप्तमधील लोकांनी गर्दी केली होती. इतके ते लोकप्रिय होते. त्यांची लोकप्रियता भारतापुरतीच नव्हती, तर भारताबाहेरही ते लोकप्रिय होते, असं ते म्हणाले. अलिकडे दिलीप कुमार यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना मी भेटून आलो होतो. त्यांच्या प्रकृतीची चौकशीही केली होती, असंही त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ५०० आदर्श शाळा स्थापित करणार – वर्षा गायकवाड

News Desk

‘पर्यावरण बचाना अपने हाथ में है भिडू’, जॅकी श्रॉफ यांनी राजभवनावर घेतली राज्यपालांची भेट

Manasi Devkar

मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ‘जुमला’ ठरु नयेत!

News Desk