HW News Marathi
महाराष्ट्र

कृषी विधेयकाबाबत काढलेल्या अधिसुचनेला राज्यात स्थगिती!

मुंबई | केंद्र सरकारने कृषी विधेयकासंबंधी जे कायदे केले आहेत ते महाराष्ट्रात लागू होणार नसल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. जे काही कायदे कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या संदर्भात केंद्राने केले आहेत ते राज्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठीसुद्धा महत्वाचे आहेत. दरम्यान, हे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे नाहीत असे स्पष्ट मत कॉंग्रेसचे आहे. आणि म्हणूनच राज्यात कृषी विधेयकाबाबत काढलेल्या अधिसूचनेला स्थगिती दिली आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून देशव्यापी आंदोलन करण्यात आले होते. मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या तीन कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी (२७ सप्टेंबर) मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या तिन्ही विधयकांचे कायद्यात रूपांतर झाले आहे. दरम्यान पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी ही विधेयके मागे घेण्याची मागणी केली होती. तर राष्ट्रपतींनी या विधेयकांवर स्वाक्षरी करू नये अशी विरोधकांची मागणी होती. मात्र राष्ट्रपतींनी या तिन्ही विधेयकांवर स्वाक्षरी करत मंजुरी दिली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगावात ‘कमळ’ फुललं 

swarit

समाज,देश आणि राष्ट्राला प्राधान्य देत काम करणाऱ्या कंपन्यासह संस्था कौतुकास पात्र! – मुख्यमंत्री

Aprna

सचिन वाझेंना जे.जे रुग्णालयात केले दाखल 

News Desk