HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीतील शेतकरी आज उपवास ठेवून साजरा करणार ‘सद्भावना दिवस’

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या ३ कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी आज (३० जानेवारी) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सद्भावना दिवस साजरा करणार आहेत. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी हे सर्व शेतकरी उपवास करणार आहेत. सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या आंदोलनातील सर्व नेते, आंदोलक उपवास करतील, अशी माहिती शुक्रवारी (२९ जानेवारी) संध्याकाळी सिंघू सीमेवर झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

किसान एकता मोर्चाच्या नेते याविषयी बोलताना असे म्हणाले की, “आम्ही देशवासियांना देखील ३० जानेवारीला होणाऱ्या आमच्या या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन करतो. यावेळी आम्ही ३० जानेवारी हा दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करणार आहोत. आमचे सर्व नेते, आंदोलक सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उपवास करतील.”

दरम्यान, प्रजासत्ताक दिनी या शेतकरी आंदोलनाला मिळालेल्या हिंसक वळणानंतर भाजपकडून होणाऱ्या टिकेलाही शेतकऱ्यांनी उत्तर दिले आहे. शेतकरी नेते युद्धवीर सिंह म्हणाले की, “भाजपने आम्हाला तिरंग्याच्या सन्मानाबाबत सल्ले देऊ नयेत. आमच्या बहुतांश शेतकऱ्यांची मुले ही सीमेवर देशासाठी पहारा देत आहेत.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात, जीवितहानी नाही

Gauri Tilekar

सर्वोच्च न्यायालयात सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी सुनावणी पूर्ण, निर्णय ठेवला राखून 

News Desk

देशाला सुंदर पिचाई यांनी केली सर्वाधिक आर्थिक मदत

News Desk