HW News Marathi
महाराष्ट्र

संकटांनी ग्रस्त शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पाथरी | शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेल्या संकटाची मालिका थांबत नसल्याने शेवटी वैतागून शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची घटना पाथरी तालुक्यातील लोणी येथे घडली असून गळफास घेत ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या शेतकऱ्याने जीवन यात्रा संपवली आहे. पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक चे शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य असणारे धोंडीराम गिराम असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत शेतकऱ्याने बँक ऑफ महाराष्ट्र शाखेकडून घेतलेल्या कर्जाची सवलत योजनेमध्ये पैशाचा भरणा करून मुलगा सदाशिव गिराम यांच्या नावे पीक कर्जाची नवीन फाईल दाखल केली होती.

सदर कर्ज एका महिन्याच्या आत देण्यात येईल असे बँकेच्या वतीने त्यांना सांगण्यात आले होते. दरम्यान सहा महिने चकरा मारल्यानंतर ही बँकेने मात्र कर्ज देण्यास टाळाटाळ केली .मध्यंतरी एक महिन्यापूर्वी त्यांचा ऊस लिंबा येथील खाजगी साखर कारखान्यास गेला असून सदरील कारखान्याने अद्याप पर्यंत उसाचे बिल काढले नाही. त्यामुळे गिराम यांच्या आर्थिक संकटांमध्ये भर पडली. अशातच दोन दिवसांपूर्वी त्यांचे वीज कनेक्शन कट केल्याने व ते पूर्ववत करण्यासाठी पैसा भरण्याचे सांगितल्याने आधीच आर्थिक विवंचनेत असणाऱ्या धोंडीराम चव्हाण यांनी काल (२४डिसेंबर) रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गुंज रस्त्यावरील एका शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .त्यांच्या पश्चात एक मुलगा ,दोन मुली व नातवंडे असा परिवार असून मृत्यूप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांनी सांगितलं BJP सोबतचं 25 वर्षांचं नातं!

News Desk

गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही, महेश टिळेकरांची टीका

News Desk

“परमबीर सिंह-सचिन वाझेंची भेट नियमबाह्य, पोलिसांकडून होणार चौकशी!” – गृहमंत्री

News Desk