HW News Marathi
महाराष्ट्र

नीरव मोदीच्या जमिनीवर शेतकऱ्यांचा कब्जा

अहमदनगर | नीरव मोदीच्या कर्जत तालुक्यात खंडाळामधील १२५ एकर जमिनीवर शेतकऱ्यांनी कब्जा केला आहे. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणि बैलगाड्या घेऊन जमीन नांगरली आहे. या ठिकाणी शेतकरी शेती करणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. काळी आई मुक्ती संग्रामाचा नारा देत शेतकऱ्यांनी जमिनीवर कब्जा केला आहे. कारण शेतकऱ्याकडून या जमिनी कवडीमोलाच्या किंमती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलेले आहे.

पीएनबी बँकेला ११ हजार ४०० कोटी घोटाळा करुन हिरा व्यापारी नीरव मोदी परदेशात फरार झाला आहे. त्यानंतर सीबीआयने नीरव मोदीच्या देशभरातील शोरुममधील छापे टाकून हिरे जप्त केले आहेत. ईडीने देखील मोदीच्या खंडाळ्याची जमिन आणि संपत्ती सील केली आहे.

तसेच बँकेकडून अशा लोकांना करोडो रुपये देतात. शेतकऱ्यांना साधे १० हजार रुपये दिले जात नाही. म्हणून शेतकऱ्यांनी अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे. या जमिनीवर फायरस्टोन स्टोन कंपनीच्या उर्जा प्रकल्पा सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फडणवीसांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी!

News Desk

#Coronavirus :  बारामतीत सातवा कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

‘सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोना विरोधात’ – उद्धव ठाकरे

News Desk