HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरकारने काँग्रेसला संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले | सोनिया गांधी

नवी दिल्ली | गेल्या चार वर्षात मोदी सरकारने काँग्रेसला संपवण्यासाठी साम-दाम-दंड-भेद सर्व प्रयत्न केले. काँग्रेस ही सत्तेच्या अहंकारा पुढे कधी झुकली नाही आणि झुकणारही नाही, असे काँग्रेस अध्यक्ष आणि युपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या महाअधिवेशनाच्या वेळी बोलत होते.

पुढे ‘सब का साथ, सब का विकास’ आणि ‘न खऊंगा, न खने दुंगा’ या घोषणाबाजी करत भाजप सत्तेत आली. पण, सत्तेत आल्यानंतर त्यांनी लोकांना दिलेला आश्वासनाचा विसर पडला आहे. तसेच काँग्रेस बदल आजही लोकांच्या मनात प्रेम आहे. काँग्रेसच्या या महाअधिवेशनात अनेक तब्बल १२ हजार कार्यकर्ते सामील झाले आहे.

भाजप सरकाराने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे त्यांच्या विरोधात वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीने अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे. या ठरावाला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मोदी सरकार विरोधात सर्व विरोधक एकत्र आले आहेत. सोमवारी मोदी सरकार विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव लोकसभेत मांडण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात कोरोनाचा हाहाकार

swarit

राज्यसभेत पेगॅसस प्रकरणावरून पुन्हा गोंधळ, मंत्र्यांच्या हातातून निवेदन खेचून फाडलं!

News Desk

रामजन्मभूमीसंदर्भात झालेला जमीन घोटाळा हा श्रीमंतांचा अपराध ! शिवसेनेचा घणाघात

News Desk