HW News Marathi
महाराष्ट्र

“शेतकऱ्यांना वीज बिल भरावंच लागेल”,उर्जामंत्री भडकले!

पुणे। भारत हा कृषी प्रधान देश मानला जातो. आणि विशेषतः महाराष्ट्र राज्य यात मोठ्या प्रमाणावर अग्रेसर आहे. आणि आता मात्र शेती कामाला वेग आला आहे. शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अश्यातच आता शेतकऱ्यांना मोठा सामना करावा लागणार आहे. कारण राज्यात वीज बिल थकित असल्यामुळे कृषी पंपाचं वीज कनेक्शन कापण्याची मोहीम ऊर्जा विभागाकडून हाती घेण्यात आली आहे. नुकतीच पेरणी झालेली, गहू, ज्वारी, हरभरा, ऊसाला पाणी देण्याचं काम सुरु असताना वीज कनेक्शन कापलं जात असल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. या पार्श्वभूमीवर भाजपकडून ऊर्जा विभागाच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत. भाजपच्या या भूमिकेवर आता ऊर्जामंत्री नितीन राऊत चांगलेच संतापले आहेत. वीज फुकटात तयार होत नाही. त्यासाठी कोळला लागतो, पैसा लागतो, कर्ज काढावं लागतं, ते आणायचं कुठून?अस म्हणत आता ऊर्जा मंत्री नितीन राऊत भडकले.

तोंडाला पानं पुसण्याचं काम केंद्राकडून केलं जात

शेतकऱ्यांना वीज बिल भरावंच लागेच. फार तर त्यांना वीज बिल भरण्याची सवलत देऊ शकतो आणि ती दिलेली आहे. भाजपनं सवय लावून ठेवलीय. महावितरणवर 56 हजार कोटीचा बोजा आलाय तो भरायचा कुठून? असा सवाल नितीन राऊत यांनी भाजप नेत्यांना केलाय. दुसरीकडे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरुनही नितीन राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधलाय. केंद्र सरकारचे दिल्लीतील नेते कशी टीका करतात हेच समजत नाही. केंद्र सरकारनं इंधनाचे दर कमी करण्याचे प्रयत्न केले नाहीत. क्रूड ऑईलचे दर कमी असताना त्यांच्याकडून कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केंद्राकडून केलं जात आहे, अशी टीका राऊत यांनी केलीय.

भाजपने शेतकऱ्यांना सवय लावून ठेवली

पुढे बोलताना ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणालेत की, कोळसा, पाणी यापासून वीज निर्मिती होते. त्याला पैसे मोजावे लागतात. वीज वापरतात मग वीज बिल भरायला का नको वाटतं? मुंबई अंधारात बुडाली तेव्हाही आम्ही तत्काळ वीज पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. भाजपने शेतकऱ्यांना सवय लावून ठेवली आहे. अडचण निर्माण केली आहे. 56 हजार कोटींचा बोजा आलाय, तो भरायचा कसा? असंही राऊत यावेळी म्हणाले.मात्र या सगळ्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी करायची की लाईटबिल भरायचे हाच मुद्दा उपस्थित होतोय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले….

News Desk

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’

News Desk

भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पराकाष्ठा करावी

News Desk