HW News Marathi
महाराष्ट्र

शेतीचे पंचनामे करण्याऐवजी गावचे तलाठी गोव्याच्या सहलीला

बुलडाणा – महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसापासून झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेततीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला गावचे तलाठी मात्र गोव्याच्या सहलीला गेले आहेत. यातून प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रति किती असंवेदनशील हे कळते. नुकसान झालेल्या शेतीची तपासणी आणि पंचनामे करुन प्रशासनाकडे देणे, जेणे करुन शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई मिळेल. पण, हे करण्याऐवजी गावच्या तलाठ्यांना सहलीला जाणे महत्त्वाचे वाटते.

शेतकरी शेतीचे पंचनामे लवकरात लवकर व्हावे म्हणून तहसील कार्यालयात गेल्यानंतर कळाले. की, आलेवाडी, वसाली आणि लाडणापूर या गावातील तलाठी परवानगी न घेता गोव्याच्या सहलीला गेले आहे. तलाठ्यांनी सहलीला जाण्यासाठी फक्त अर्ज केला होता. तो अर्ज मजूंर झाला की नाही याबदद्ल देखील परवा न करता गोव्याला निघून गेले. त्यामुळे चार दिवस उलटूनही संग्रामपूर तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अजूनही झाले नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत पेट्रोलने गाठली शंभरी, सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

News Desk

लता मंगेशकरांना कोरोनाची लागण; राजकीय नेत्यांनी केली प्रार्थना

News Desk

“आव्हाडांकडे पाठपुरावा केला, पण मुख्यमंत्र्यांकडे जाईपर्यंत दखल घेतली नाही”, शिवसेना आमदाराची भूमिका

News Desk