HW News Marathi
महाराष्ट्र

आधी फडणवीस, आता शेलार म्हणाले विमानतळाच्या उद्घाटनला मुख्यमंत्र्यांनी यावं!

मुंबई। मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावण्याचं विधान केलं होतं. त्यावेळी आम्ही राणेंच्या विधानाशी सहमत नाही, पण राणेंच्या पाठीशी आहोत, असं सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या विधानापासून फारकत घेतली होती. आता भाजप नेते आशिष शेलार यांनी राणेंच्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाशी संबंधित विधानावरून फारकत घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सन्मान राखला पाहिजे. त्यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आलं पाहिजे, असं शेलार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान झाला पाहिजे

आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राणेंच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यानी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी प्रोटोकॉल अधिकारी नाही. पण महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला असे वाटते की, भले शिवसेनेचा प्रयत्नामुळे चिपी विमानतळ झालं नसेल, भाजपच्या मुहूर्तमेढीमुळे झालं असेल तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान झाला पाहिजे. त्यांनी कार्यक्रमाला आलं पाहिजे असे माझे मत आहे, असं शेलार म्हणाले.

नारायण राणे पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते?

नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन चिपी विमानतळाबाबतची तारीख जाहीर केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला येणार आहेत का? असा सवाल राणेंना करण्यात आला. त्यावेळी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे उद्घाटन करतील. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावलंच पाहिजे असं काही नाही, असं राणे म्हणाले होते.

नेमकं प्रकरण काय आहे?

यावेळी त्यांनी विनायक राऊत आणि शिवसेना यांचा चिपी विमानतळ उभारणीशी संबंध काय?, असा सवालही केला. चिपी विमानतळाचं 1999 ला भूमिपूजन झालं तेव्हा केंद्रात भाजपचे सरकार आणि पंतप्रधान होते. त्यावेळी ज्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला त्यात विनायक राऊत होते का? त्यांचा कोकण रेल्वेशी कधीच संबंध नव्हता. चिपी विमानतळाबाबतीत विनायक राऊत यांनी बोलघेवडेपणा करू नये. नारायण राणे आता केंद्रीय कॅबिनेटमध्ये आहेत. भाजप या विषयाचा पाठपुरावा करते आहे. या प्रकल्पाची मुहूर्तमेढच भाजपने रोवली आहे. आणि ते होणार आहे म्हटल्यावर चालत्या गाडीमध्ये शिरण्याचा प्रकार विनायक राऊत आहेत. जर हे श्रेय तुमचे होते तर ते गेल्या 15 वर्षात का नाही झालं? भाजपचे प्रयत्न आणि राणेंचा पाठपुरावा यावर हा प्रकल्प उभा राहिला आहे याचा आम्हाला आनंद आहे, असं सांगतानाच विनायक राऊत यांनी उद्घाटनाची तारीख जाहीर करणे हे कुठल्या घुसखोरी कायद्यात बसते? अशा प्रकारामुळे मतं मिळत नाहीत, तर अप्रमाणिकता दिसते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चित्रा वाघ म्हणतात रावणाला मदत करणारी शुर्पणखा, आता चाकणकरांकडून उत्तर!

News Desk

“कोणत्याही ST कामगाराला कामावर येण्यापासून अडवू नका!” – अनिल परब

News Desk

महाड येथे काँग्रेसच्या मेळाव्याला सुरुवात

News Desk