HW News Marathi
महाराष्ट्र

सांगलीत बचावकार्यादरम्यान बोट उलटून ९ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

सांगली | राज्यात सध्या विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भीषण पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. सांगलीत बचावकार्य सुरु असताना पुराच्या पाण्याचा प्रवाहामुळे एक खाजगी बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. सांगली येथील पलूस तालुक्यातील पूरग्रस्तांना घेऊन जाणारी खाजगी बोट उलटून १६ जण बुडाले आहेत. त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला असून अन्य बेपत्ता नागरिकांचा शोध सुरु आहे. उलटलेल्या या बोटीत एकूण २५ ते ३० जण असल्याची माहिती मिळत आहे.

सांगली येथील पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावात सुरु असलेल्या बचावकार्यादरम्यान एक खाजगी बस उलटून झालेल्या दुर्घटनेत ४ महिला, ३ पुरुष यांच्यासह २ लहान मुले अशा एकूण ९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप मृतांची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. सांगलीत कृष्णेला आलेल्या महापुरामुळे येथील नागरिकांना भीषण पूरस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून येथील बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तांत्रिक बिघाडामुळे बाधित सर्व भागांचा वीजपुरवठा झाला सुरळीत

News Desk

धरणे आंदोलनात शेकडो पत्रकारांचा सहभाग 

News Desk

“सुनील शिंदेंना त्यांच्या त्यागाचं फळ मिळालं!”, – संजय राऊत

News Desk