HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री पूर परिस्थितीची पाहाणी करण्यासाठी रवाना

कोल्हापूर | कोल्हापूर, सांगली कराडमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (८ ऑगस्ट) कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी लष्करी विमानाने कोल्हापूर आणि सांगली येथील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रवाना झाले आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकूण २२ टीम महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफ ५, नौदल १४, कोस्टगार्ड १, आर्मी १ अशा ११ टीम सांगलीसाठी रवाना केल्या आहेत. या पूर परिस्थितीमुळे आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून बोट उलटून १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

पूर परिस्थितीची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. कोल्हापूर जिल्ह्या सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून सांगली जिल्ह्य़ातील मिरज, वाळवा, शिराळा, पलूस या चार तालुक्यांना आणि सांगली शहर तसेच सातारा जिल्हय़ातील सातारा, कराड, पाटण, वाई या तालुक्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुख राजीनामा देऊन थेट दिल्लीला रवाना

News Desk

कर्जमाफी प्रकियेतील आधार कार्डचा घोळ

News Desk

शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द

News Desk