HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमध्ये राष्ट्रवादीला जबर धक्का! संदीप क्षीरसागरांचे 5 खंदेसमर्थक शिवसेनेत दाखल

बीड | शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर या काका पुतण्यांचा राजकीय वाद काही नवीन नाहीये. मात्र, आगामी निवडणुकीच्या तोंडावर काका जयदत्त क्षीरसागर हे पुन्हा सक्रिय झाले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांचे पाच खांदे समर्थक काकांनी फोडले असून आज त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करून घेतला आहे. फारूक पटेल यांच्यासह तब्बल पाच शिलेदार फुटल्याने संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या उपस्थितीत पाच जणांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झालाय. नगरसेवक अमर नाईकवाडे, फारूक पटेल, राष्ट्रवादी नेते नितीन लोढा, गंगाधर घुमरे, बाबूशेठ लोढा यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करीत शिवबंधन हातात बांधून घेतले आहे.

मागच्या अनेक दिवसांपासून ज्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते, ते एकेकाळचे राष्ट्रवादीचे आ. संदीप क्षीरसागर यांच्या विजयातील बिनीचे शिलेदार आज शिवसेनेत प्रवेश केलेआहे. मागच्या वर्ष दिड वर्षांपासून तसे ते आ. संदीप क्षीरसागर यांच्यापासून दुरावले होतेच, आता मात्र ते थेट सेनेत प्रवेश केले आहे. या प्रवेशामुळे जिथे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे , त्याचवेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि पर्यायायाने बीड नगरपालिकेसाठी डॉ. योगेश क्षीरसागर यांची शक्ती वाढणार आहे.

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे चुलते असणारे शिवसेनेचे तत्कालीन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला होता. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात संदीप क्षीरसागर जायंट किलर ठरले होते. संदीप क्षीरसागर यांच्याकडे त्यावेळी फारशी यंत्रणाही नव्हती आणि मोठ्या संस्थांचे जाळेही नव्हते, तरीही त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला, त्यामागे त्यांना बीड शहरातून मिळालेले प्रचंड मताधिक्य आणि ग्रामीण भागात जयदत्त क्षीरसागर यांचा वारू रोखण्याचे संदीप क्षीरसागर यांच्या बिनीच्या शिलेदारांनी केलेले प्रयत्न हेच कारण होते. त्यावेळी काकू नाना आघाडीचा भाग असलेले पण संदीप क्षीरसागर यांच्यासोबत राष्ट्रवादीत असलेल्या कार्यकर्त्यांसोबतच राष्ट्रवादीत नसलेल्या लोढा कुटुंबाने देखील संदीप क्षीरसागर यांचीच कुमक केली होती.

बीड शहरात डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना सातत्याने आव्हान देण्याची भूमिका संदीप क्षीरसागर यांच्यासाठी अमर नाईकवाडे आणि फारूक पटेल यांनी घेतली होती. तर ग्रामीण भागात गंगाधर घुमरे यांनी आक्रमकपणाने खिंड लढविली होती. मात्र मागच्या अडीच वर्षात राष्ट्रवादीत आणि संदीप क्षीरसागर यांच्याकडे हेच लोक उपेक्षित राहिले. म्हणूनच आता या लोकांचे शिवसेनेत जाणे राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असणार आहे.

आता मागच्या दिड वर्षांपासून राष्ट्रवादीत उपेक्षित असणारे घुमरे, नाईकवाडे, पटेल हे नेते जर शिवसेना सोडून इतर कोणत्या पक्षात गेले असते तर राष्ट्रवादीला तितकासा फरक कदाचित पडला नसता, मात्र यांची ताकत शिवसेनेला मिळणे पर्यायाने जयदत्त क्षीरसागर यांची शक्ती वाढली आहे. ही राष्ट्रवादीसाठी येणार्‍या नगरपालिका आणि जिल्हापरिषद, पंचायतसमिती निवडणुकांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. त्यामुळेच आजच्या प्रवेशाने बीडच्या राजकारणाची दिशा बदलणार आहे.

जयदत्त क्षीरसागरांची शेरो-शायरीतून टीका

‘सुबह का भूला शाम को घर आ जाए, तो उसे भूला नहीं कहते, असं शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर म्हणाले. प्रवेशाचा राष्ट्रीय महामार्ग सुरू राहील, असंही ते यावेळी म्हणालेत. दरम्यान, ‘सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं’, असं म्हणत त्यांनी आमदार संदीप क्षीरसागरांवर टीका केलीय. तर यावेळी बोलताना, कालिक मूह पे लगी है, आईने मे देख रहे है, असा टोला त्यांनी संदीप क्षीरसागरांना लगावलाय.

भारतभूषण क्षीरसागरांकडूनही टीका

पक्ष प्रवेशावेळी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनीही आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका केलीय. ‘हे पाच पांडव आमच्या घरात होते. मात्र, आमचं घर फुटल्यानंतर ते त्या घरी गेले. आज पुन्हा आमच्या घरात आले. महाविकास आघाडी सरकार असताना केवळ शिवसेनेच्या नगरपरिषदेचा निधी देण्यात येत नाही. शिवसेनेचं काही चुकत आहे का? आम्ही आणलेल्या निधीचा इथले आमदार श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी 35 वर्ष नगराध्यक्ष आहे. मी कधीच आमदार व्हायचं म्हंटलं नाही. पदासाठी रक्ताचं नातं तोडलं. माझ्यात विष कालविण्याचा प्रयत्न केला. क्षीरसागर यांचा हा जनसागर आहे. काकू नाना यांनी आम्हाला बेरजेचं राजकारण शिकविलं आहे.’ असंही नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यावेळी म्हणालेत.

अमर नाईकवाडेंची टीका

‘आमदार संदीप क्षीरसागर यांनी धमक असले तर किमान स्वत:च्या गावात रस्ता आणून दाखवावा’, असं खुल आव्हान राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले नगरपरिषद सदस्य अमर नाईकवाडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना दिलंय. मतदारसंघातील वयोवृद्ध लोकांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार संदीप क्षीरसागर शिवीगाळ करत असल्याचा आरोपही नाईकवाडे यांनी केलाय. यावेळी बोलताना नाईकवाडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला.

“बीडचे बशीरगंज भागात आयोजित सोहळ्यात बोलताना माजी मंत्री क्षीरसागर यांनी राजकारणात चढउतार येत असतात, काही लोक अपघाताने पदावर येतात, मात्र ज्या चूका झाल्या त्या दुरुस्त करण्याची ही योग्य वेळ आहे. आम्ही सुडाच राजकारण कधी केलं नाही. आता या पाच जणांच्या प्रवेशाने आपली टीम मजबूत झाली आहे. आम्ही विकासाचा राजकारण करतो मात्र विरोधक सुडाच राजकारण करतात”, अशी टीका देखील त्यांनी केली. यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी या पाच जणांची घरवापसी झाली आहे, अस सांगत हे आमच्याच घरात होते पण दुसरं घर झाल्याने तिकडे गेले मात्र ते घर बेघर झालं म्हणून हे परत मूळ घरात आले अस म्हटलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढली हे तर गडकरींचे यश

News Desk

अजितदादा, आपण इतकी वर्ष उगाच वेगळे राहिलो !

News Desk

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी ५ जूनला मतदान

Aprna