HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंना खड्यांचा फटका, आलिशान रेंजरोव्हरचे फुटले टायर

नाशिक | युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या गाडीला रस्त्यावरच्या खड्ड्यांचा फटका बसला आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नाशिकला जात असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचे टायर घोटीजवळ आल्यानंतर फुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे दुसऱ्या गाडीने त्यांना हॉटेलला पोहोचावे लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मुंबई-नाशिक रस्त्यावरील घोटीजवळील पाडळी गावात ही घटना घडली. पाडळीच्या रस्त्यावर खूप मोठे खड्डे आहेत. या खड्ड्यांमधून जाताना त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याचे सांगितले जात आहे. खड्ड्यांचा त्रास तुम्हा-आम्हाला नवीन नाही. पण जेव्हा आदित्य ठाकरेंसारख्या राजकीय नेत्याच्या गाडीचे टायर मध्यरात्री फुटते, तेव्हा मात्र सोबतच्या सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडते.

या घटनेनंतर दुसऱ्या गाडीने आदित्य ठाकरे मुक्कामासाठी हॉटेलवर पोहोचले. त्यानंतर टायर फुटलेली गाडी टोईंग करुन नाशिकमध्ये आणली गेली आणि दोन्ही टायर बदलण्यात आले.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या गाडीचं टायर फुटण्याची घटना ज्या घोटी परिसरात घडली, त्याच परिसरातील दुसऱ्या रस्त्यांची खूपच दुर्दशा झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शरद पवारांच्या भेटीसाठी अजित पवार ‘सिल्व्हर ओक’वर दाखल

News Desk

गडचिरोलीमध्ये ट्रक-बसमध्ये मोठी धडक, ५ जणांचा मृत्यू

News Desk

२७ जानेवारीपासून मुंबईत ‘नाइट लाइफ’, निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरी

swarit
क्रीडा

भारतीय महिला कबड्डी संघाला रौप्य पदक

News Desk

पालेमबांग | भारताच्या कबड्डी या खेळाला आशियाई क्रीडा स्पर्धेत जबरदस्त धक्का बसला आहे. उगवता तारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इराणने भारताच्या पुरुषांच्या कबड्डी संघाला गुरुवारी हरविल्यानंतर इराणच्या महिला संघाने शुक्रवारी भारतीय महिला संघाला जेतेपदाच्या लढतीत २७-२४ अशा फरकाने हरवत सुवर्णपदक जिंकले.

त्यामुळे भारताच्या सलग तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक जिंकण्याच्या आशांवर पाणी फेरले गेले. इराणच्या या ऐतिहासिक विजयात भारतीय वंशाच्या प्रशिक्षक शैलजा जैन यांचा मोलाचा वाटा होता. यावेळी पंचांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाचा फटका भारतीय संघाला बसला. पुरुषांच्या गटातही इराण अजिंक्य ठरला.

Related posts

माजी हेविवेट चॅम्पियन माइक टायसन मुंबईत

News Desk

क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

swarit

कपिल देव यांनी केली समीक्षा, भारताच्या संघाचा का झाला पराजय

News Desk