HW News Marathi
Covid-19

मतदारसंघामध्ये कोरोनाबद्दल जनजागृती अभियानात चव्हाणांना जाणवल्या अडचणी, मुख्यमंत्र्यांकडे केल्या ‘या’ मागण्या

मुंबई | राज्य सरकार हे कोरोनाच्या लढाईत प्रभावीपण काम करत आहे. याबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारचे अभिनंदन केले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने दक्षिण कराड मतदारसंघात जनजागृतीच्या वेळी लोकांशी संवाद काही अडचणी जाणवल्या आहे, यासंदर्भात चव्हाम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रद्वारे केले आहे. या पत्रात त्यांनी वैद्यकीय, स्वस्त धान्य दुकान, कृषि अर्थ व्यवसाय, कोरोना साथी संदर्भात अधिकृत माहिती आणि लॉकडाऊन यांदर्भात अडचणी त्यांनी सविस्तररित्या सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण हे देखील ते स्वत: दक्षिण कराड मतदारसंघात जाऊन लोकांना या आजाराचे स्थानिक लोकांना गांभीर्य पटवून देत घ्यावयाच्या दक्षतांचे तंतोतंत पालन व्हावे म्हणून आवाहन करत आहेत. यामुळे चव्हाण यांना लोकांशी संवाद साधताना बऱ्याच अडचणी जाणवल्या.

 

महाराष्ट्र कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या काल (२३ एप्रिल) ६ हजार ४२७ इतका झाला आहे. तर राज्यात ८४० कोरोनामुक्तही झाल्याची दिलासादायक बातमी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राज्यात कालपर्यंत ७७८ कोरोना रुग्णांच्या संख्ये वाढ झाल्याची माहिती दिली आहे. देशात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा हा २३,०७७ झाला असून ७१८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, गेल्या २४ तासांत देशात १६८४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण   

News Desk

औरंगाबादमध्ये आज १७ नव्या रुग्णांची भर, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४९५ वर

News Desk

१८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाचा वेग मंदावणार? राजेश टोपे म्हणतात…

News Desk