HW News Marathi
Covid-19

लॉकडाऊन नको या मोदींच्या भूमिकेनंतर महाराष्ट्रात उध्दव ठाकरे लॉकडाऊन आज लावणार?

मुंबई | देशातील कोरोना स्थिती चिंताजनक होत चालली आहे. याच मुद्द्याला धरून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ‘लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी भूमिका मांडत लॉकडाऊन नको, असा सल्ला दिला आहे. त्यांच्या या घोषणेनंतर आता महाराष्ट्रात लॉकडाऊन बाबत राज्यसरकार आपला निर्णय रद्द करणार की कायम ठेवणार याकडे लक्ष लागले आहे.

राज्यात कोरोनाची वाढती संख्या कमी होत नाही आहे. या सर्व गोष्टी पाहता राज्य सरकारने आजपासुन कडक लॉकडाऊन लागू होणार असे संकेत दिले होते. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला असेही काल काही मंत्र्यांनी सांगितले. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार असल्याचे देखील जाहीर करण्यात आले. ही घोषणा होते न होते तोच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केलं आहे.

यात लॉकडाऊन देशाला परवडणारे नाही, त्यामुळे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा, अशी भूमिका जाहीर केली. त्याच बरोबर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून ठेवा ही भूमिका घेतली आहे. या सर्व बाबी पाहता राज्यसरकार स्वतःचा लॉकडाऊन बाबत घेतलेल्या निर्णय वर ठाम राहत का ? याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.

राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्वाधिक दैनंदिन मृत्यू महाराष्ट्रात आहेत, अशा परिस्थितीत राज्यात ऑक्सिजन आणि रेमडीसीवीरची कमतरता भासत आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन लावावा याबाबत सर्व मंत्र्यांनी आग्रही भूमिका घेतली. अखेर मंत्रिमंडळात याबाबत निर्णय झाला आहे. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

News Desk

कोरोनामुळे मुंबईत सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

News Desk

एक कोरोना रूग्ण सापडला तर बाजूची २० घरं सिल करणार,’या’ राज्याचा निर्णय!

News Desk