HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी-अंबानीचे स्पिकर !

यवतमाळ | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी-अंबानीचे स्पिकर आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी यवतमाळच्या वणी आज (१५ ऑक्टोबर) प्रचार सभा मोदींवर निशाणा साधला. राहुल गांधी पुढे म्हणले की, “नरेंद्र मोदी हे अंबानी-अदानीने कामावर ठेवले आहे. सरळ गोष्ट आहे की, मोदी हे अंबानी-अदानीचे स्पिकर आहेत, असा आरोप राहुल गांधींनी मोदीवर केला आहे. अदानी-अंबानीचे स्पिकर बनून सामान्यांचे लक्ष विचलित करीत आहेत. सामान्यांचे लक्ष विचलित झाले की त्यांच्या खिशातून पैसे काढून देत आहेत,” असे राहुल गांधी दरम्यान म्हणाले

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अंबानी-अदानी कर्ज माफी केली आहेत. हिदुस्तान पॅट्रोलियम आणि एअरइंडियाला प्रॉवेट करत आहे. मोदी संपूर्ण देश १५-२० लोकांच्या हातात द्याचे आहे. इकडे शेतकरी आत्महत्या करत आहे तर तरुण रोजगारासाठी पूर्ण आयुष्य वेच राहिली, नरेंद्र मोदी हे अंबानी-अदानीने कामावर ठेवले आहे. सरळ गोष्ट आहे की, मोदी हे अंबानी-अदानीचे स्पिकर आहेत, असा आरोप राहुल गांधींनी मोदीवर केला आहे. अदानी-अंबानीचे स्पिकर बनून सामान्यांचे लक्ष विचलित करीत आहेत. सामान्यांचे लक्ष विचलित झाले की त्यांच्या खिशातून पैसे काढून देत आहेत.”

मोदी जिथे जातात, तिथे खोटे बोलतात !

पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातात, तिथे खोटे बोलतात, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. यावळी प्रचार सभा संबोधित करताना राहुल गांधी हा आरोप केला होता. सामान नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये आणि सहा हजार रुपये जमा करणार असल्याचे आश्वासन लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिले होते. मात्र, नागरिकांच्या खात्या ना १५ लाख रुपये आणि ना सहा हजार रुपये जमा झाले नाही, असे म्हणत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली.

राहुल गांधी म्हटले की, “नरेंद्र मोदी जेथे जातात, तेथे खोटे बोलतात. ते कधी चंद्राची गोष्ट करतात, तर कधी कलम ३७०च्या विषयावर चर्चा करतात. शेतकरी व बेरोजगारांच्या प्रश्नावर मात्र त्यांच्यावर ते काही बोलत नाहीत. मोदींनी सांगितले होते की, महाराष्ट्र शेतकऱ्यांचे कर्ज माफी करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आजही शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली नाही, असे म्हणत त्यांनी मोदींवर सभेदरम्यान घणाघाती हल्ला केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालामधून दिसते – जयंत पाटील

News Desk

“दीड वर्ष नाही १५ दिवसांत तुम्हाला धावपट्टी बांधून देतो”, नितीन गडकरींनी दिला शब्द

News Desk

भविष्यात आघाडीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करू – नाना पटोले

News Desk