HW News Marathi
महाराष्ट्र

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ED कोठडी

मुंबई | दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. मलिकांना ईडीच्या कोठडीत औषधे आणि त्यांच्या घरचे जेवण मिळावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी सत्र न्यायालयात केली होती. आणि ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे.

दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असून दाऊची बहिण हसिना पारकर यांच्याशी मलिकांचा संबंध आहे, असे न्यायालयात ईडीच्या वकिलांनी युक्तिवाद केला. आणि दाऊच्या सात ठिकाणच्या संपत्तीचे मालिका मलिक असल्यामुळे त्यांचा थेट संबंध हा अंडरवर्ल्डशी जोडला गेला आहे, असा युक्तिवाद न्यायालयात झाला.

न्यायालयात गेल्या दोन तासांपेक्षा जास्त वेळापासून युक्तीवात सुरू आहे. ईडीच्या वकिलांनी न्यायालयाकडे मलिकांची १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. ईडीने कोणताही समन्य न देता मलिकांच्या घरी जावून त्यांना चौकशीसाठी आल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले आहे. 

मलिकांची ८ तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केले. मलिकांना मेडिकल चेकअपसाठी जे. जे. रुग्णालयात घेऊन गेले. त्यावेळी मलिकांनी “झुकेंगे नही, और लढेंगें,” अशी प्रतिक्रिया ईडीच्या कार्यलयातून बाहेर येताना दिली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज (२३ फेब्रुवारी) पहाटे ४.३० वाजता मलिकांच्या पोहोचले. ईडीच्या कार्यलयात मलिकांची सकाळी ७ वाजता घेऊन केले तर ७.४५ वाजल्यापासून कार्यलयात त्यांची चौकशी सुरू आहे. मलिकांच्या अधिकाऱ्यांसोबत सीआरपीएफचे जवान होते. मलिकांना ईडीने अटक केल्यापासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यलयाबाहेर घोषणाबाजी केली. 

मलिकांवर लावलेले आरोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेणार नाही – भुजबळ

“मलिकांवर लावलेले आरोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेणार नाही. तर मग त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही,” असे म्हणत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मलिकांचा राजीनाम्याच्या चर्चेवर पूर्णविराम लावला आहे. मलिकांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. मलिकांच्या राजीनाम्याचा आसुरी आनंद घेऊ देणार नाही. मलिकांची अटक ही दुर्दैवी बाब आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महाविकासआघाडी सरकार पाडण्याचे कारस्थान असल्याचे प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर भुजबळ म्हणाले, ” होय, हे महाविकासआघाडी सरकार पाडण्याचे कारस्थान असून मुद्दाम एकेकाला टार्गेट करण्याचा प्रयत्न. दरम्यान, मविआचे सर्व नेते मुंबईत उद्या (२४ फेब्रुवारी) मंत्रालयाच्या शेजारी महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ मलिकांवरील कारवाईच्या विरोधात आंदोलन करणार आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डबल मास्क आणि फेस शिल्ड लावण्याचे पोलिसांना हेमंत नगराळेंचे आदेश

News Desk

“मी घर बदलणार नाही आहे तिथं आहे”, शिवसेनेच्या ऑफरवर पंकजा मुंडेंचे उत्तर

News Desk

‘मंदा म्हात्रेंच्या विधानावर आता चंद्रकांत पाटलांचं उत्तर! म्हणाले….’

News Desk