HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे पक्षावर नाराज?

बीड | बीड जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष तथा बीडचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे हे पक्षावर नाराज असून पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगू लागल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर बजरंग सोनवणे यांनी बीड येथे पत्रकार परिषद आयोजित करून पक्षाबद्धल मोठा खुलासा केला आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षावर नाराज असल्याच्या चर्चांना त्यांनी कायमस्वरूपी पूर्ण विराम दिला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, “मी १९९२ ला राजकारणात आलो वयाच्या २१ व्या वर्षी मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यांस ३१ वर्षे एकनिष्ठ काम केले आणि पक्षास एकनिस्ट असणार आहे. तर येडेश्वरी साखर कारखान्याची माझी मोठी जबाबदारी आहे. समाज आणि जनतेशी माझी बांधिलकी आहे”, असे ते म्हणाले. तसेच मला जिल्हाध्यक्ष पदावरून मला कमी केले, याबद्धल मला खंत नाही, असे वक्तव्य त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे. 

ते पुढे म्हणाले, मी आदरणीय शरदचंद्र पवार, अजितदादा पवार, धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना त्यांनी स्पष्ट केले आहे. तर माझ्या कार्यकर्त्यांना माझ्याबद्दल झालेला त्यांच्या मनातील गैरसमज मी आज दूर केला आहे, असा खुलासाही यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलतांना केला आहे. तर पुढील काळात येणाऱ्या निवडणुका मी नक्कीच लढवणार असून त्यासाठी मी नाराज नसून पक्षाचा आदेश माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ असल्याचेही बजरंग सोनवणे यांनी सांगितले. यामुळे बजरंग सोनवणे नाराज असल्याच्या चर्चांना मात्र त्यांनी आज पूर्णविराम दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली हे आपल्यालाच उशिरा कळले, असे सांगत ही प्रक्रिया पार पडली तेव्हा आपण नॉट रीचेबल होतो, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी दिले. मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी अंबाजोगाई चे राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली. त्यानंतर बजरंग सोनवणे आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर तब्बल आठ दिवसांनी सोनवणे हे मिडियासमोर आले.

आपण चार साडेचार वर्षाच्या काळात लोकसभा निवडणूक लढलो, विधानसभेत चार आमदार निवडून आणले. जिल्हा परिषद ताब्यात घेतली. मात्र, नवीन जिल्हाध्यक्ष निवडताना आपण हजर नव्हतो आणि आपल्याला ही गोष्ट मिडियामधून समजली असे त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“विरोधी पक्षनेता म्हणून दौरा येत्या 3 दिवसांत करणारचं” शरद पवारांच्या आवाहनाला उत्तर…!

News Desk

‘राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा’, तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी!

News Desk

संभाजीराजे, उद्धव ठाकरे व अशोक चव्हाण यांची मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईत बैठक

News Desk