HW News Marathi
महाराष्ट्र

माजी न्यायमूर्ती अभय ठिपसेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि खासदार कुमार केतकर यांच्या उपस्थितीत अभय ठिपसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

अभय ठिपसे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती, अलाहाबाद उच्च न्यायालयांचे न्यायाधीशपदही भूषवले आहे. ठिपसे यांनी सोहराबुद्दीन इन्काऊंटर प्रकरणावरुनच भाजपवर टीका केली होती. सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात अनेक अनियमितता आढळल्या आहेत. या खटल्याबाबत प्रश्न उपस्थित करत अनेक बड्या आरोपींना मुक्त केल्याचा आरोप अभय ठिपसे यांनी केला होता. ठिपसे यांनी सलमान खानची हिट अँड रन केस, बेस्ट बेकरी केस, साध्वी प्रज्ञा केस यांसारखी अनेक प्रकरणे न्यायमूर्ती असताना हाताळली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वाधवान कुटुंब महाबळेश्वरला कोणाच्या आदेशाने किंवा आशीर्वादाने गेले, सीएम आणि गृहमंत्र्यांना फडवीसांचा सवाल

News Desk

दवाखाना इमारतीवर जिल्हा परिषद उमेदवाराचे जाहिराती

News Desk

राज्यपाल अभिभाषण न करता विधानसभेतून निघून गेले; ‘मविआ’ नेत्यांचे आंदोलन

Aprna
महाराष्ट्र

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पराभव निश्चित – राहुल गांधी

swarit

मुंबई : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपचा पराभव करतील असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोरेगाव येथे बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये बूथ स्तरीय काँग्रेस कार्यकर्त्यांच्या महासंमेलनमध्ये व्यक्त केला. राहुल गांधी पुढे असे देखील म्हटले की, भाजपचा कर्नाटकात पराभव झाला असून गुजरातमध्ये त्यांनी स्वत:ला कसेबसे वाचवले. परंतु मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्येही त्यांचा पराभव होईल, असे वक्तव्य राहुल यावेळी बोलत होते.

मोदी सरकार महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांनर काहीच बोलत नाहीत. या तिन्ही समस्या सोडवण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. विचारधारेसाठी माझी लढाई सुरु राहणार आणि ही लढाई आम्ही नक्की जिंकू असा आत्मविश्वास राहुल यांनी यावेळी व्यक्त केला.

जर भाजपला कोणी हरवेल तर फक्त काँग्रेसची विचारधारा हरवू शकते. तसेच काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या रक्षण करण्याचे काम माझे आहे. काँग्रेस पार्टी ही नेत्यांची नाही तर कार्यकर्त्यांची पार्टी आहे. जिथे भाजप आणि आरएसएसचे लोक आग लावतील तिथे तिथे जाऊन तुम्ही पाणी टाका आणि ती आग विझवा, असे राहुल यांनी कार्यकर्तांना संबोधित करताना सांगितले.

या महासंमेलनात राहुल गांधींच्या हस्ते काँग्रेसच्या शक्ती कँम्पेन या प्रोजेक्टचे अनावरण करुन एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला. मुंबई ज्याप्रमाणे सर्व वर्गातील लोकांना सामावून घेते. त्याचप्रमाणे काँग्रेस देखील प्रत्येक वर्गातील व्यक्ती सामावून घेते. आणि काँग्रेसमध्ये सर्वजण मिळून काम करतात, मुंबईतील सभेला संबोधित करताना राहुल गांधी भाजपचा खरपूस समाचार घेतला. या महासंमेलनात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, भाई जगताप, जनार्दन चांदुरकर, राजू वाघमारे यांच्यासह मुंबतील काँग्रेस नेते मंडळी यावेळी उपस्थित होते.

Related posts

“…तर तस तुम्ही राजश्रीला वहिनी साहेब म्हणू नका”, धनंजय मुंडेंची उपरोधिक टीका!

News Desk

उस्मानाबादत बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यक- दीड हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Aprna

ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्या किंवा सर्वच निवडणुका पुढे ढकला!- छगन भुजबळ

News Desk