HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानच्या गोळीबारात चार जवान शहीद, पाच जखमी

श्रीनगर | पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर गोळीबार केल्यामुळे चार भारतीय जवानांना वीरमरण आले आहे. या गोळीबारात चार जवानांना वीर मरण तर पाच जवान जखमी झाले आहेत. रामगड विभागातल्या चांबिया येथे पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन रात्रीपासून तुफान गोळीबार केला.

जम्मूच्या रामगड विभागातील चमलियाल पोस्टवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या गोळीबारत बीएसएफच्या एका असिस्टंट कमांडेंटला वीरमऱण आले असून मंगळवारी रात्रीपासूनच पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेपलीकडून गोळीबार करत आहे. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनामध्ये वाढ झाली आहे. शनिवारी ही अखनूरमधील परगवाल विभागात पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला होता. यात बीएसएफचे दोन जवान शहीद झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…मग राजीव गांधींची हत्या देखील अपघातच होता का ?

News Desk

काँग्रेसने आता कार्यालयांना टाळे लावून कायमचे घरी बसावे हेच बरे!

News Desk

केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार !

News Desk