HW News Marathi
महाराष्ट्र

२०१४मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेकडून काँग्रेसला प्रस्ताव !

मुंबई | “२०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेकडून काँग्रेसला प्रस्ताव पाठविला होता,” असा राजकीय भूंकप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हा खळबळजनक दावा केला आहे. यानंतर चव्हाणांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुलाखतीतदरम्यान, चव्हाण म्हणाले की, “२०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला सत्तेपासून दूर रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. मात्र, मी तो प्रस्ताव तातडीने फेटाळून लावला. त्यावेळी काँग्रेसला कमी जागांवर यश आले होते. त्यामुळे आम्ही विरोधात बसणार हे निश्चित केले होते. राजकारणात जय-पराजय होत असतात”, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

“२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने लोकशाही संपविण्याचा प्रयत्न गेला केला. यावेळी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी-काँग्रेसच्या ४० आमदारांना धमकीचे आणि आमिषाचे फोन येऊ लागले. तेव्हा परिस्थितीदरम्यान भाजप आणि शिवसेनेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या नेतृत्त्वात महाविकासाडीचे सरकार स्थापन झाले आहे. सुरुवातीच्या काळात काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाविकासआघाडीला पाठिंबा देण्यासाठी तयार नव्हत्या. मात्र, अनेक चर्चांनंतर त्यांनी अनुकूल भूमिका घेतली”, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पदवीधर निवडणूकीत राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण

News Desk

योगी सरकारच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर आल्या ८,५०० सूचना!

News Desk

वार्तांकनावर निर्बंध आणणा-या नांदेड मनपाचा निषेध- विजय जोशी

News Desk