HW News Marathi
Covid-19

लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना मूळगावी जाण्यासाठी ११ मेपासून मोफत एसटी प्रवास

मुंबई | महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे आडकून पडलेल्या श्रमिक, विद्यार्थी आणि इतर त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या सर्व श्रमिक आणि कामगारांना सोमवारपासून (११ मे) एसटीतून मोफत त्यांच्या गावी नेहण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज (९ मे) दिली आहे. एका बसमध्ये केवळ २२ लोकांना त्यांच्या मूळगावी सोडणार असून ही सविधा १८ मेपर्यंत असल्याची माहिती परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे.

तसेच राज्यातील कोणत्याही रेड झोन कंटेन्मेंट झोनमधील कोणत्याही व्यक्तीला प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. कुणालाही कंटेन्मेंट झोनमध्ये सोडले जाणार नाही, असे स्पष्ट संकेतही परब यांनी दिले आहे. राज्यातील जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, विद्यार्थी आणि इतर लोक शहरातील लोकांनी त्यांची यादी पोलीस ठाण्यात द्यावी आणि गावामधील लोकांनी यादी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे सोपवावी, असे परब यांनी सांगितले. तसेच स्थलांतरित लोकांनी त्यांचे मोबाइल नंबर, आधारकार्ड, कोणत्या राज्यातील कोणत्या जिल्यातील कुठे जायचे आहे, ही सर्वा माहिती द्यावी, अशा सूचनाही परब यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालयात परवानगीसाठी गर्दी करू नये

परब यांनी दिलेल्या सुचनानुसार, एका राज्यात आणि जिल्ह्यात जाणाऱ्या २२ जणांचा ग्रुप झाल्यानंतर पोलीस किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी मजूर, विद्यार्थी आणि इतर लोकांना बस सुटण्याचे ठिकाण सांगण्यात येईल. यानुसार सर्वांनी बस डेपो येऊन गावी जाण्याची बस पकडावी. तसेच बसमध्ये प्रत्येक सीटवर एकच प्रवासी असून मास्क लावून आलेल्या प्रवाशांनाच एसटीत प्रवेश असेल, असे सांगतानाच कुणीही पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयात परवानगी मिळावी म्हणून गर्दी करू नये, असे आवाहनही परब यांनी केल आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत आता सातव्या क्रमांकावर

News Desk

ऑस्ट्रेलियाने १५ मेपर्यंत रद्द केली भारतातून येणारी प्रवासी विमाने

News Desk

दारूचे कारखाने लाॅकडाऊन काळातही सुरू होते का?, विश्वंभर चौधरींचा सरकारला सवाल

News Desk