HW News Marathi
Covid-19

कोरोनाचे संकट जरी वाढले तरी सरकार पूर्णपणे तयार – केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली | कोरोनाची स्थिती सध्या देशामध्ये गंभीर होत चालली आहे. कंद्र आणि राज्य सरकार आरोग्य यंत्रणेच्या जोडीने सर्व प्रयत्न करत आहेत. दरमयान, कोरोनाचे संकट जरी वाढले तरी सरकार पूर्णपणे तयार असल्याचा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे. विकसित देशांमध्ये आहे तितकी गंभीर परिस्थिती आपल्याकडे निर्माण होणार नाही अशा विश्वासही यावेळी त्यांनी सर्व नागरिकांना दिला आहे.

आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी इतर विकसित देशांप्रमाणे आपल्याकडे परिस्थिती अत्यंत गंभीर होण्याची शक्यता वाटत नाही. मात्र, तरीही गंभीर परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीने आम्ही पूर्ण तयारी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, देशात मृत्यू दर हा ३.३ टक्के इतका आहे. बरे होणाऱ्याचे प्रमाण २९.९ टक्क्यांवर पोहोचला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आणि महत्त्वाचे म्हणजे डबलिंग रेट गेल्या ७ दिववसांपासून ९.९ दिवसांवर पोहोचल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला संबोधित करणार

News Desk

राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला, कर्ज काढण्याचा सल्ला देवू नये !

News Desk

संभाजीराजेंची मोठी घोषणा ! 16 जूनपासून कोल्हापूरातून होणार मराठा आंदोलनाला सुरुवात

News Desk