HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस १२ मेपासून करणार राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा

मुंबई | राज्यातील भीषण दुष्काळस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील टिळक भवन येथे आज (१० मे) काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी राज्यातील दुष्काळस्थितीचा आढावा घेण्यात आला.आज संध्याकाळी ५ वाजता राज्यपालांना भेटून आपण राज्यातील दुष्काळबाबत निवेदन देणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्याचप्रमाणे, काँग्रेसची टीम १२ मेपासून २० मेपर्यंत राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

  • राज्यातील दुष्काळाची शासनाकडून गंभीर दखल घेतली जात नाही
  • सरकारने कागदावर नियोजन केले. परंतु, डिसेंबरनंतर निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.
  • सरकारला निवडणुकीच्या कामाला वेळ मिळाला
  • सरकारचा कारभार नियोजन शून्य
  • सरकारने फक्त खोट बोलण्याचे काम केले. जी परिस्थिती निर्माण झाली त्याला सरकार जबाबदार आहे.
  • पालकमंत्री कुठेच फिरकले नाहीत
  • आज संध्यकाळी ५ वाजता आम्ही राज्यपालांना भेटणार आणि दुष्काळबाबत निवेदन देणार
  • पीक कर्ज तातडीने देण्यात यावे
  • कर्जमाफीपासून वंचित असणाऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ठाकरे सरकारने आता आढेवेढे न घेता मराठा समाजाला न्याय द्यावा”, भाजपची सरकारला मागणी

News Desk

‘रामराज्य’ येईल अशी मराठी जनतेची अपेक्षा, पूर्ण होऊ द्या इतकेच !

News Desk

तांत्रिक बिघाडामुळे बाधित सर्व भागांचा वीजपुरवठा झाला सुरळीत

News Desk