HW News Marathi
महाराष्ट्र

शहीद मेजर शशीधरन नायर यांच्‍या पार्थिवावर लष्‍करी इतमामात अंत्यसंस्कार

जम्मू | काश्मीरमध्ये शुक्रवारी (११ जानेवारी) रात्री झालेल्या स्फोटात सीमेवर भारतभूमीची सुरक्षा करताना वीरमरण आलेले मेजर शशीधरन नायर यांच्या पार्थिवावर आज (१३ जानेवारी) सकाळी दहा वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमी येथे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. खडकवासला येथील मेजर शशीधरन नायर यांचे पार्थिव शनिवारी(१२ जानेवारी) सायंकाळी विशेष विमानाने पुण्यात आणण्यात आले.

त्यानंतर त्यांचे पार्थिव दक्षिण मुख्यालयातील ‘नॅशनल वॉर मेमोरियल’ येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. येथे त्यांना आजी-माजी लष्करी अधिकार्‍यांकडून पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. नॅशनल मेमोरियल वॉर येथे शशीधरन यांची आजी, आई लता नायर, पत्नी तृप्ती, बहीण सीना हे कुटुंबिय उपस्थित होते. त्यांचे पार्थिव दक्षिण मुख्यालयाच्या रुग्णालयात रात्रभर ठेवण्यात येणार असून, सकाळी सात वाजता खडकवासला येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

मेजर शशीधरन नायर यांचा अल्प परिचय

मेजर शशीधरन नायर मूळचे केरळचे असून सध्यया नायर कुटुंबीय सध्या खडकवासला येथे स्थायिक झाले आहे. शशीधरन यांचा जन्म ३० जुलै १९८५ रोजी झाला. त्यांनी केंद्रिय विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले. येथेच त्यांनी ‘एनसीसी’मध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट स्नातक किताबही पटकावला होता. यानंतर शशीधर यांनी ‘एनडीए’ येथे तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत, सन २००७ मध्ये भारतीय लष्करात प्रवेश मिळविला. त्यांच्या सैन्यदलातील ११ वषार्र्ंच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. शशीधरन यांनी चार वषार्र्ंपूर्वी कॉलेजमधील दिव्यांग मैत्रीण व संगणक अभियंता तृप्ती यांच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला. त्यांचे वडील विजय नायर यांचे काही वर्षापूर्वीच निधन झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गावठी कट्ट्यातून गोळी सुटल्याने बालकाचा मृत्यू

News Desk

महाराष्ट्रातील अस्थिरता संपविण्यासाठी ‘नीळकंठ’ व्हायला आम्ही तयार !

News Desk

अडतीस गाव पाणी पुरवठा सौर प्रकल्पामुळे २५ लाखांहून अधिक पैशांची होणार बचत! – छगन भुजबळ

Aprna