HW News Marathi
महाराष्ट्र

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजप युती होऊ शकते, गिरीश बापटांचं वक्तव्य

पुणे | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलंय. यावर भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आणि शिवसेनेची पुन्हा युती होऊ शकते, असं गिरीश बापट यांनी म्हटलंय. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

भाजप-सेनेची युती ही हिंदुत्वावर होती. ती पुढेही होऊ शकते. कारण हिंदुत्व हा आपला श्वास आहे. कारण मला असं वाटतंय ही सर्वांच्या मनातील बोलकी प्रतिक्रिया आहे. प्रताप सरनाईक सर्वांच्या मनातील बोलले आहेत. भविष्यात युती होऊ शकते, असं मत गिरीश बापट यांनी व्यक्त केलं आहे. भाजपने याआधीही सांगितलं होतं, तुमची आमची नैसर्गिक युती आहे. पण मधल्या काळात कृत्रिम लोकांनी ती तोडली. पण भविष्यात अशी युती झाली तर भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आनंद होईल, असं गिरीश बापट म्हणाले.

दरम्यान, पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहे. महापालिकेत शिवसेना भाजपा युती होऊ शकते, पुणे महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आम्ही शिवसेनेला प्राधान्य देऊ, असंही खासदार गिरीश बापट म्हणाले.

प्रताप सरनाईक यांचं पत्र

ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असा दावाही सरनाईक यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेस्टोरंट, मंदिरे पुन्हा सुरु करण्याबाबत चर्चा, मात्र लोकल रुळावर येण्यास वाट पाहावी लागणार

News Desk

आमच्या विश्वासार्हतेला तडा गेला !

News Desk

सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय आल्यावर ईडीला सामोरं जाणार- अनिल देशमुख

News Desk