HW News Marathi
महाराष्ट्र

बॉलिवूड क्षेत्र यात काम करायला मोठी संधी,अशी कामं होत असतील तर त्याला प्रोत्साहनच दिलं पाहिजे – गिरीश बापट

पुणे | मुंबईतील बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यावर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड असो किंवा इतर सांस्कृतिक क्षेत्र यात काम करायला मोठी संधी आहे. अशी कामं होत असतील तर त्याला प्रोत्साहनच दिलं पाहिजे, असं विधान बापट यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “मुंबईतून बॉलिवूड कोणीही नेऊ शकत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बॉलिवूडप्रमाणे एखादा उद्योग त्यांच्या राज्यात सुरु करावा याच्या अभ्यासासाठी येत असावेत,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पदवीधर निवडणुकीसाठी आज (१ डिसेंबर) मतदान होत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सहकुटुंब जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आले आहेत. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा सवाल बापट यांना करण्यात आला. तेव्हा, योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. बॉलिवूड असो किंवा इतर सांस्कृतिक क्षेत्र यात काम करायला मोठी संधी आहे. अशी कामं झाली तर आनंद व्यक्त करायला हवा, दुःख व्यक्त करण्याचं कारण नाही. योगी आदित्यनाथ यांच उत्तर प्रदेशातलं काम हे अभिनंदनीय आहे, असं बापट म्हणाले आहेत.

“राज्यातील महाविकास आघाडी सरकार आम्हाला पाडण्यात आम्हाला रस नाही. त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे सरकार त्यांचाच वजनामुळे पडेल,” असं मत पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केलं. खासदार गिरीश बापट यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत आपल्या कुटुंबीयांसह मतदान हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच यावेळी अनेक विषयांवर भाष्यदेखील केलं.

“राज्यातील महाआघाडी सरकार करोनाची महासाथ हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून महापूर, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडले. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष पाहण्यास मिळत आहे. तसेच महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत असून आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे हे सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही. हे त्यांच्याच वजनाने पडेल,” असेही बापट म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेस यशाची असंख्य शिखरे गाठेल व्यक्त केला असा विश्वास…

News Desk

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध! – दिलीप वळसे -पाटील

Aprna

बेळगाव निवडणूकांवरून आता संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील आमनेसामने !

News Desk