HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसचे २५ हून अधिक आमदार भाजपच्या संपर्कात | गिरीश महाजन

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस आमदारांना आणि नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. चव्हाणांच्या या आरोपावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना की, आम्ही लोक फोडण्याचे काम करत नाही. मात्र लोक आमच्याकडे येत आहेत. काँग्रेसचे २५ हून अधिक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा महाजनांनी मुलाखतीदरम्यान केला आहे.

काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु आमच्याकडे आता जागा नाहीत, असे सांगण्याची वेळ आहे कारण इतके लोक स्वत:हून भाजपमध्ये येण्यास तयार असल्याचे महाजनांनी सांगितले. भाजपने कोणत्याही नेत्यांना प्रलोभन दाखवायचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट करतानाच अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांचा सन्मानच केला आहे, असा दावा देखील यावेळी महाजनांनी केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बदली घोटाळा प्रकरणी फडणवीसांचा जबाब नोंदवण्यास सुरुवात; भाजपच्या कार्यकर्त्यांकडून नोटीसीची होळी

Aprna

महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी महाराष्ट्र बदनाम करण्याचं कारस्थान रचलं!

News Desk

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे! – उद्धव ठाकरे

Aprna