HW News Marathi
महाराष्ट्र

सरकार तर्फे गिरीश महाजन यांची रात्री शेतकरी मोर्चाला भेट

मुंबई | सध्या मुंबईत हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन सुरू असताना सरकारला पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. गुरुवारी मुंबईतल्या आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने शेतकरी दाखल होणार आहेत. लोकसंघर्षच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले आहे.

कर्जमाफी, दुष्काळ निवारण आणि आदिवासींच्या समस्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे शेतकरी आझाद मैदानात ठिय्या धरून रहाणार आहेत.

काल रात्री हजारोंच्या संख्येने शेतकरी ठाण्यात दाखल झाले होते.ठाण्यातून आज हे शेतकरी चुनभट्टीच्या शिवाजी मैदानात दाखल झाले. तिथून ते उद्या पुढे आझाद मैदानाकडे रवाना होणार आहेत. इतक्या दुरून मुंबईत पायी चालत आलेल्या या शेतकऱ्यांची चौकशी करून परिस्थितीचा रात्री उशिरा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतला आहे. यावेळी महाजन यांनी HW मराठीला दिलेली ही खास प्रतिक्रिया.

https://www.facebook.com/hwmarathi/videos/306200256889207/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राफेलचे ताफ्यात सामील होणे गेमचेंजर ठरणार नाही – शरद पवार

News Desk

पवई पेरूबाग पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे ३०० ते ४०० कोटींचा घोटाळा; राऊतांचा सोमय्यांवर गंभीर आरोप

Aprna

आपत्कालीन परिस्थितीत शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून काम करा! – मुख्यमंत्री

Aprna
राजकारण

अयोध्या वारीसाठी सेनेला मनसे शुभेच्छा !

News Desk

मुंबई | यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावरुन भाषण करताना २५ नोव्हेंबरला अयोध्येत जावून मोदिंना राम मंदीर बांधणीबाबत प्रश्न विचारणार असल्याचे शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर मनसेने सेनाभवनासमोर आज पोस्टरबाजी केल्याचे पहायला मिळाले आहे. अयोध्येला वारीसाठी शुभेच्छा, देत राज्यातील काही गंभीर प्रश्नाबाबत काय? असे पोस्टर शिवसेना भवनसमोर लावण्यात आले आहे.

मनसेने शिवसेनेला विचारलेले प्रश्न

महाराष्ट्राचे रस्ते खड्डे मुक्त होणार का?

महागाई कमी होणार का?

महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का?

बेरोजगारांना रोजगार मिळणार का?

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का?

शेती मालाला हमी भाव मिळणार का?

महाराष्ट्रातला दुष्काळ संपणार का?

मोकळ्या जागांवरील अतिक्रमण थांबणार का?

महापालिकेतील भ्रष्टाचार संपणार का?

खिशातले राजीनामे बाहेर पडणार का?

Related posts

पालघरमध्ये भाजप बिनविरोधी जिंकण्यासाठी नवीन खेळी

News Desk

विधान परिषदेसाठी दराडेंना निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील

News Desk

माझी मुलगी पूर्णपणे निर्दोष, रॅगिंगचा विचारही करू शकत नाही !

News Desk